एक्स्प्लोर

Farmer Protest : विरोध करणाऱ्य़ा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतील : कृषिमंत्री

आज 6 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार होता, मात्र खराब हवामानाचा अंदाज असल्याने उद्या करण्यात येणार आले. 7 जानेवारीला ट्रॅक्टर सिंहु, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूर मधील सर्व आंदोलन ठिकाणी कुंडली-मानेसर-पलवलच्या (केएमपी) दिशेने मोर्चा काढतील.

नवी दिल्ली : दिल्लीच्या विविध सीमांवरील शेतकर्‍यांचे आंदोलन बुधवारी 42 व्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं की, भारत सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो. जे शेतकरी या कायद्यांचे समर्थन करत आहेत आणि जे विरोध करत आहेत, आम्ही दोघांना भेटत आहोत. कृषी कायद्याला पाठिंबा देणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही मोठी आहे. आम्ही शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यास गुंतलो आहोत. त्यामुळे आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असलेल्या शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतील आणि तोडगा काढतील, असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं.

गुरुवारी शेतकरी संघटना ट्रॅक्टर मोर्चा काढत असताना कृषीमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याआधी आज 6 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार होता, मात्र खराब हवामानाचा अंदाज असल्याने उद्या करण्यात येणार आले. 7 जानेवारीला ट्रॅक्टर सिंहु, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूर (हरियाणा-राजस्थान सीमा) मधील सर्व आंदोलन ठिकाणी कुंडली-मानेसर-पलवलच्या (केएमपी) दिशेने मोर्चा काढतील.

येत्या काही दिवसांत तिन्ही कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन तीव्र करण्यात येईल, असं शेतकरी संघटना म्हटतं आहेत. शेतकरी नेते जोगिंदर नैन यांनी 26 जानेवारीला दिल्लीसाठी प्रस्तावित केलेल्या आणखी एका ट्रॅक्टर मोर्चाविषयी सांगितले की, “आम्ही हरियाणामधील प्रत्येक खेड्यातून 10 ट्रॅक्टर ट्रॉली पाठवू. आम्ही लोकांना विनंती करतो की प्रत्येक घरातून किमान एक माणूस आणि एका गावातून एकूण 11 महिलांनी येथे उपस्थित राहावे.

येत्या 8 जानेवारी रोजी सरकार व शेतकरी यांच्यात आठवी बैठक

8 जानेवारी रोजी शेतकरी व सरकार यांच्यात आठवी फेरी बैठक होईल. सातव्या फेरीतील बैठकीत कोणताही निकाल लागला नाही. हे तीनही कृषी कायदे रद्द करावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्याचबरोबर सरकारने कायदा रद्द करण्याचा व्यतिरिक्त पर्याय देण्यास सांगितले आहे. कायदा परत येईपर्यंत आम्ही घरी परतणार नाही, असं सातव्या फेरीतील बैठक संपल्यानंतर भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले होते. आता 8 जानेवारीच्या बैठकीत तोडगा निघणार की आंदोलन अधिक तीव्र होणार हे स्पष्ट होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget