एक्स्प्लोर

Agneepath Scheme : अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात, काय आहेत नियम आणि अटी?   

Agneepath Scheme : अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्र सरकारकडून या भरतीसाठी नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत.

Agneepath Scheme : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या योजनेविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. बिहारमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. परंतु, केंद्र सरकार अग्निपथ योजना राबवण्यावर ठाम आहे.  आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्र सरकारकडून या भरतीसाठी नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. अग्निपथ योजनेतून भरती झालेल्या अग्निवीरांच्या नोकरीचा कालावधी चार वर्षांचा असेल. या योजनेतील अग्निवीर कोणत्याही प्रकारच्या पेन्शनसाठी पात्र असणार नाहीत. 
 
मध्येच नोकरी सोडता येणार नाही
केंद्र सरकाने जाहीर केलेल्या नियम आणि अटींनुसार, भरती झालेल्या अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या सेवेच्या कालावधीत मिळवलेली वर्गीकृत माहिती अधिकृत गुप्तता कायदा  1923 अंतर्गत कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताकडे उघड करता येणार नाही. नियमित केडरमध्ये सैनिकांची नोंदणी वैद्यकीय शाखेतील तांत्रिक केडर वगळता भारतीय सैन्यात केवळ अग्निवीर म्हणून कामाचा कालावधी पूर्ण केलेल्या जवानांसाठीच उपलब्ध असेल. शिवाय अटी पूर्ण होण्यापूर्वी अग्निवीरला स्वतःच्या इच्छेने नोकरी  सोडण्याची परवानगी नाही. परंतु, काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूरी दिल्यास या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना मध्येच नोकरी सोडता येईल.  

अग्निपथ योजनेंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना  जमीन, समुद्र किंवा हवाई दलामध्ये कुठेही नियुक्ती देण्यात येऊ शकते. सेवेच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर एक "विशिष्ट चिन्ह" असेल.   प्रत्येक बॅचमध्ये त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना नियमित केडरमध्ये नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. "या अर्जांचा लष्कराद्वारे त्यांच्या कामाच्या कालावधीतील कामगिरीसह इतर निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल. 

25 टक्के अग्निवीर सेवेत कायम होणार
अग्निवीरांच्या प्रत्येक बॅचमधील 25 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची चार वर्षांची नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल. नियमित केलेल्या जवानांना आणखी 15 वर्षे सैन्यात सेवेची  संधी मिळेल. हे कर्मचारी सध्या प्रचलित असलेल्या सेवा अटी आणि शर्ती (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर/इतर रँकच्या) द्वारे नियंत्रित केले जातील,"   अग्निवीरांना त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याना पुन्हा निवडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही.  नावनोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, प्रत्येक 'अग्नीवीर'ला 'अग्निपथ' योजनेच्या सर्व अटी व शर्ती औपचारिकपणे स्वीकारणे आवश्यक आहे. 

वय आणि शिक्षण
अग्निपथ योजनेसाठी शैक्षणिक योग्यता 10वी किंवा 12वी पास आवश्यक आहे. या भरतीसाठी 17 वर्षे पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. परंतु, 18 वर्षांखालील कर्मचाऱ्यांसाठी नोंदणी फॉर्मवर पालकांची स्वाक्षरी आवश्यक असेल. नियमित सेवेत असलेल्यांसाठी 90 दिवसांच्या तुलनेत 'अग्निवीर' एका वर्षात 30 दिवसांच्या रजेसाठी पात्र असतील. वैद्यकीय सल्ल्यानुसार वैद्यकीय रजा मंजूर केली जाईल.

पुरस्कार...
सेवा कालावधीक  अग्निवीरांचा विशेष कर्यासाठी सन्मान केला जाईल. शिवाय पुरस्कार देखील दिले जातील.  
 
 मानधन...
या योजनेअंतर्गत अग्निवीरांना पहिल्या वर्षी महिन्याला 30 हजार रुपये वेतन मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन 33 हजार होईल. तिसऱ्या वर्षी हे मानधन प्रति महिना 36500 मिळेल.  तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन महिना 40 हजार रुपये वेतन मिळेल. 

निवृत्ती फंड
अग्निवीरांना देण्यात येणाऱ्या पगारातून  30 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या फंडमध्ये जमा केली जाईल. या फंडामध्ये सरकारकडून आणखी 30 टक्के रक्कम जमा केली जाईल. सेवा काळ संपल्यानंतर दहा लाख चार हजार रूपये फंडाची रक्कम आणि त्यावरील व्याज कर्मचाऱ्याला मिळेल. यासोबतच जीवन विमा संरक्षण अग्निवीरांना त्यांच्या सेवेच्या कालावधीसाठी  48 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळेल. 

सेवा बजावत असताना मृत्यू झाला तर अग्निवीरांना  योग्य मोबदला दिला जाईल. त्यासाठी केंद्र सरकाने काही नियम आणि अटी जारी केल्या आहेत. कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी त्यांना दिला जाईल.  

सेवा पूर्ण झाल्यांतरचे लाभ
चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना ‘अग्नीवीर’ कौशल्य प्रमाणपत्र मिळेल. कालावधीच्या शेवटी अग्निवीरांना तपशीलवार कौशल्य संच प्रमाणपत्र दिले जाईल. अग्निवीरांनी आपल्या सेवा कालावधीत  प्राप्त केलेली कौशल्ये आणि सक्षमतेचा या प्रमाणपत्रावर उल्लेख करण्यात येईल.   
 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget