एक्स्प्लोर

Manoj Jarange : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं, जरांगे पाटलांची भुजबळांवर जहरी टीका 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरु असून आज जरांगेंच्या सभेचं हिंगोलीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधलाय. 

हिंगोली : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं असं म्हणत जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. शुक्रवार 7 डिसेंबर रोजी हिंगोलीत (Hingoli) जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.  जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर ही सभा होती. ही सभा 110 एकरवर  घेण्यात आली असून 140 एकरवर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली गेली होती. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची सभा झाली होती, त्यानंतर आज जरांगे यांनी सभा घेतली. 

शांततेत आंदोलन करण्याचा हक्क संविधानाने दिला - जरांगे पाटील

शांततेत आंदोलन करणं हा संविधानाने आम्हाला दिलेला हक्का आहे.  मराठा आरक्षणाचा विषय संपवयचा मराठ्यांनी ठरवलं.आमच्या चूक काय या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नाही. मराठ्यांना मोडून काढण्याचं सरकारचं षडयंत्र होतं. पण आम्ही भ्ययलो नाही. जे भ्यायले ते मराठे नाहीत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 


त्याला आता सुट्टी नाही, जरांगेंची भुजबळांवर टीका

आता त्याला सुट्टी नाही, त्याच्या माघं मी आहेचं, असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केला. तो जातीय तेढ निर्माण करतोय. गावाखेड्यातील ओबीसी मराठ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मला शिक्षण नसून मी आरक्षण निर्णयावर आणलं की नाही, तू जर शिकलेला होतास तर तुरुगांत कशाला गेला, असा सवाल जरांगे पाटलांनी भुजबळांना विचारला. 

दोन महिने होऊनही गुन्हे मागे का घेतले नाहीत - जरांगेंचा सवाल

दोन महिने होऊनही गु्न्हे मागे का घेतले नाही, असा सवाल देखील जरांगे पाटलांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला. आमच्या विरोधात डाव रचू नका. त्या एकट्याचं ऐकून आमच्या विरोधात जाऊ नका गेलात तर जड जाईल, असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला. 

सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार - जरांगे पाटील

सरसकट मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास जरांगे पाटलांनी यावेळी व्यक्त केला. 17 डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. या राज्यातील सर्व उपोषणकर्ते आणि बांधवांनी यावेळी उपस्थित राहायचं आहे, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. 

हेही वाचा : 

'जरांगे म्हणाले सभेला टाकून येऊ नका रे...'; प्रशासनाने थेट सभेच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करून टाकलं

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget