एक्स्प्लोर

Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर ओसरला, आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी खुला, भंडाऱ्यातही पुराचा धोका टळला

Vidarbha Rain : सध्या विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

Vidarbha Rain : मागील तीन ते चार दिवसात विदर्भात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला होता. यामुळं नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. तसेच वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. मात्र, सध्या विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यातही पुराचा धोका टळला आहे.  वैनगंगा नदी शांत झाली आहे. दरम्याम, गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुलं वाहतुकीवर परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळं पार्लकोट इंद्रावती नदीला प्रचंड पूर आला होता. त्यामुळं भामरागड गावात पुराच्या पाण्याने शिरकाव केला होता. अनेक घरे पाण्याखाली आली होती. भामरागड गावाला बेटाच स्वरुप आलं होतं. मात्र, आता पूर पुर्णपणे ओसरला असून गावात पुरामुळं मोठया प्रमाणात चिखल पसरला असून ते काढण्याचं काम सुरू आहे. तर पार्लकोट नदीच्या  पुलावर देखील चिखल लाकूड असल्याने ते देखील साफ करण्याचं काम सुरू आहे. भामरागडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. 


Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर ओसरला, आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी खुला, भंडाऱ्यातही पुराचा धोका टळला

78 तासानंतर वैनगंगा नदी सामान्य पातळीवर, मात्र, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी झाली शांत झाली आहे. पुराचे पाणी ओसरले आहे. नदीने आपली सामान्य पाणी पातळी गाठली आहे. मात्र, गोसेखुर्दचा अद्याप विसर्ग सुरु असल्याने नदी काठावरील गावांना इशारा दिला आहे. भंडारा जिल्हाला आलेला पुराचा धोका टळला असून, अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी शांत झाली आहे. दरम्यान, भंडारा आणि कारधा नदिला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पुलावरील पाणीही ओसरले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात या पुराचा 40 गावांना फटका बसला होता. तर 3 हजारच्यावर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली होती. मात्र,आता पूर ओसरल्याने हळूहळू सर्व स्थिती पूर्वपदावर येणार आहे. दरम्यान, पूर ओसरल्याने जिल्हा प्रशासनद्वारे युद्ध पातळीवर पंचनामे सुरु झाले आहेत. तसेच चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. तेथील स्थिती देखील पूर्वपदावर येत आहे.


Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर ओसरला, आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी खुला, भंडाऱ्यातही पुराचा धोका टळला

पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता

दरम्यान, कोकण वगळता आजपासून (18 ऑगस्ट)  संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. परंतू, स्वच्छ सूर्यप्रकाश व पूर्णतः उघडीपीची शक्यता कमीच असल्याची माहिती यावेळी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं नद्या आणि कॅनॉल पात्रातील सततचा विसर्ग तसाच कायम ठेवावा लागणार आहे.   

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Ashram School Snake Bite: आश्रम शाळेत सहा विद्यार्थ्यांना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडून मोठी कारवाई, 'या' 25 मुद्द्यांवर आक्षेप
आश्रम शाळेत सहा विद्यार्थ्यांना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडून मोठी कारवाई, 'या' 25 मुद्द्यांवर आक्षेप
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget