एक्स्प्लोर

आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत, दिल्लीच्या 'मातोश्री' आदेश देतात : फडणवीस

विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार कधीही फार काळ टिकू शकत नाही, असेही त्यांनी सांगितलं. सरकार बनल्यापासून या सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र काम करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे.

पालघर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देताना मोदी साहेबांच्या भरवशावर शब्द दिला होता का? सरकार तयार करताना मोदी आठवले नाहीत का? असे सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी स्व. बाळासाहेबांना दिलं होतं. मात्र ते काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्री करेन असं होत का? असा सवाल त्यांनी केला. आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत तर दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात, असेही फडणवीस म्हणाले. बाळासाहेब यांना आज काय दुःख झालं असेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करून जनतेशी विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारकडून आता राज्यातील शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका प्रारंभ झाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी आज पालघर येथे बोलताना केला. सहा जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील कासा(वरोती) येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण, आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. आता त्यांनी निदान राज्यातील सरकार नीट चालवायला हवे. विश्वासघात हा जसा या सरकारच्या गठनाचा पाया आहे. तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नाही. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले. पण सप्टेंबर 2019 ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. मात्र शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार कधीही फार काळ टिकू शकत नाही, असेही त्यांनी सांगितलं. सरकार बनल्यापासून या सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र काम करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे सांगतात की राज्यातील जनतेला आनंद व सुख समाधान द्यायचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे आमदार आणि शिवसैनिक आनंदी नाहीत अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांनी यांचा सात बारा कोरा केला पाहिजे - आदिवासींना वन पट्टे देण्याचं काम आमच्या सरकारकडून - पाच वर्षांच्या कामावर जनतेने आपल्याला कौल दिला होता - ज्या निवडणुका झाल्या त्यात आपल्याला यश - बेईमानी कशी झाली ते जनतेला सांगा - एकीकडे सावरकरांना शिव्या दिल्या तरी शिवसेना निमूटपणे - नागरिकता कायद्यावर तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा - मातोश्री वरून आदेश आता येत नाही, दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात - काल परवा मंत्रिमंडळ तयार झालं मात्र त्यानंतर काय झालं ते सगळ्यांना माहीती आहे - काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचंच कार्यालय फोडलं - बेईमानींनी सरकार तयार केलं तशी बेईमानी पहिल्या दिवसापासून सुरू केली - काळजीवाहू सरकार असताना देखील आम्ही 10 हजार कोटी दिले - त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी देण्याची मागणी - 25 हजारांचं आश्वासन देणार सरकार आलं मात्र शेतकऱ्यांच्या या हाती भोपळा आला

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 July 2026: आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅगची तपासणी होणार, लोकलमधून जाताना धारदार हत्यारे सोबत नेण्यावर निर्बंध, रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय 
Bombay High Court : 'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', सरकारच्या निर्णयांचा विरोध, घोषणाबाजीमुळं हद्दपार करता येणार नाही, मुंबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
'सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय', राजकीय पक्षाच्या नेत्याची हद्दपारी रद्द, मुबई हायकोर्टानं पोलिसांना झापलं
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget