एक्स्प्लोर

आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत, दिल्लीच्या 'मातोश्री' आदेश देतात : फडणवीस

विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार कधीही फार काळ टिकू शकत नाही, असेही त्यांनी सांगितलं. सरकार बनल्यापासून या सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र काम करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे.

पालघर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देताना मोदी साहेबांच्या भरवशावर शब्द दिला होता का? सरकार तयार करताना मोदी आठवले नाहीत का? असे सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी स्व. बाळासाहेबांना दिलं होतं. मात्र ते काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्री करेन असं होत का? असा सवाल त्यांनी केला. आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत तर दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात, असेही फडणवीस म्हणाले. बाळासाहेब यांना आज काय दुःख झालं असेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करून जनतेशी विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारकडून आता राज्यातील शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका प्रारंभ झाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी आज पालघर येथे बोलताना केला. सहा जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील कासा(वरोती) येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण, आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. आता त्यांनी निदान राज्यातील सरकार नीट चालवायला हवे. विश्वासघात हा जसा या सरकारच्या गठनाचा पाया आहे. तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकर्‍यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नाही. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले. पण सप्टेंबर 2019 ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. मात्र शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, विश्वासघात हा ज्या सरकारचा पाया आहे, ते सरकार कधीही फार काळ टिकू शकत नाही, असेही त्यांनी सांगितलं. सरकार बनल्यापासून या सरकारचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. विभिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र काम करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे सांगतात की राज्यातील जनतेला आनंद व सुख समाधान द्यायचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे आमदार आणि शिवसैनिक आनंदी नाहीत अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांनी यांचा सात बारा कोरा केला पाहिजे - आदिवासींना वन पट्टे देण्याचं काम आमच्या सरकारकडून - पाच वर्षांच्या कामावर जनतेने आपल्याला कौल दिला होता - ज्या निवडणुका झाल्या त्यात आपल्याला यश - बेईमानी कशी झाली ते जनतेला सांगा - एकीकडे सावरकरांना शिव्या दिल्या तरी शिवसेना निमूटपणे - नागरिकता कायद्यावर तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा - मातोश्री वरून आदेश आता येत नाही, दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात - काल परवा मंत्रिमंडळ तयार झालं मात्र त्यानंतर काय झालं ते सगळ्यांना माहीती आहे - काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचंच कार्यालय फोडलं - बेईमानींनी सरकार तयार केलं तशी बेईमानी पहिल्या दिवसापासून सुरू केली - काळजीवाहू सरकार असताना देखील आम्ही 10 हजार कोटी दिले - त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार हेक्टरी देण्याची मागणी - 25 हजारांचं आश्वासन देणार सरकार आलं मात्र शेतकऱ्यांच्या या हाती भोपळा आला
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Astrology : चांगल्या सवयींनी ग्रहांचे दोष करा दूर; ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या 14 महत्त्वाच्या गोष्टी
चांगल्या सवयींनी ग्रहांचे दोष करा दूर; ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या 14 महत्त्वाच्या गोष्टी
Surya Dev: आयुष्यभर राजासारखं जीवन, 'या' 3 राशींवर सूर्यदेवांचं प्रेम, पैशांची कमतरता शक्यतो नाहीच, पुढचं वर्ष आरामात? ज्योतिषशास्त्र...
आयुष्यभर राजासारखं जीवन, 'या' 3 राशींवर सूर्यदेवांचं प्रेम, पैशांची कमतरता शक्यतो नाहीच, पुढचं वर्ष आरामात? ज्योतिषशास्त्र...
Laxman Hake on OBC Reservation: 'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता...'
प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता...'

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Laxman Hake on OBC Reservation: 'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Popular Singers Accident: कार्यक्रम आटोपून घरी जाताना तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
Kantara Fame Actress Rukmini Vasanth Deepfake Video: 'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेकचा तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
'कांतारा'फेम अभिनेत्रीचे बिकिनीमधील फोटो- व्हिडीओ व्हायरल, डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर, रुक्मिणी वसंत संतापून म्हणाली...
Embed widget