एक्स्प्लोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट, मात्र सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता : उद्धव ठाकरे

भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

नागपूर : आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहोत. आम्ही भिन्न विचारांची माणसं आहोत. कालही आमच्या विचारात भिन्नता होती. आजही त्यात भिन्नता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. मात्र, सरकार चालवण्यासाठी समान कार्यक्रम ठरवला आहे. सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. भाजपने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे म्हणाले की, भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल त्यांनी केला. यावेळी ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल उचलत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटींची गरज असल्याच्या मुद्याचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या 23 हजार कोटींच्या मदतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही जणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. हे ही वाचा -  शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यावेळी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार का? या प्रश्नावर ठाकरे यांनी नाव देणार का? नाही तर नाव दिलं असं म्हणतं या नामकरणावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात जर कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, या प्रकरणात जो कोणी जबाबदारी असेल त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी विरोधकांच्या 'स्थगिती सरकार' च्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे. रात्रीतून तेथे वृक्षतोड करून सजीवसृष्टी नष्ट करण्यात आल्यानं  स्थगिती दिलेली आहे. सरकारने कोणत्या कामांना स्थगिती दिली त्याची यादी त्यांनी द्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Eknath Shinde: गावी आलो, दिल्लीत गेलो आणि लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी, एकनाथ शिंदे दरे गावातून बोलताना म्हणाले....
गावी आलो, दिल्लीत गेलो आणि लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी, आरोपांना कामातून उत्तर देणार : एकनाथ शिंदे
प्रसूतीदरम्यान महिला व बाळाचा मृत्यू! जळगावच्या खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप
प्रसूतीदरम्यान महिला व बाळाचा मृत्यू! जळगावच्या खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळीच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Embed widget