एक्स्प्लोर

Marathwada Cabinet Meeting : फडणवीसांच्या 'त्या' घोषणांचं काय झालं? अंबादास दानवेंनी यादीच वाचून दाखवली

Ambadas Danve : तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणांचं काय झालं?: अंबादास दानवे

औरंगाबाद : उद्या औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या घोषणांचं काय झालं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच फडणवीस यांनी त्यावेळी केलेल्या घोषणा ज्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, अशा कामांची यादीच दानवे यांनी वाचून दाखवली आहे. 

2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी 41 हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत, त्यांनी इतर अवास्तव घोषणा केल्यापेक्षा स्वतः घोषणा केलेले कामे पूर्ण करावे, असे दानवे म्हणाले. 

अंबादास दानवेंकडून जाहीर करण्यात आलेली यादी.... 

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?
  • धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. 
  • सुमारे 450 कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.
  • नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित केलेले सुमारे 250 कोटी कुठे आहेत?
  • लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते, त्याचं काय झालं?
  • मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून 1000 गावात दूध योजना आणून 1.25 लाख लोकांना रोजगार देणार होतात, त्याचे काय झाले?
  • औरंगाबादच्या करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात.
  • परभणी येथे 68 एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात? त्याचं काय झालं?
  • मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना संतगतीने सुरु आहे.
  • कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी 4800 कोटी देणार होतात? त्याचे काय झालं?
  • सिंचन प्रकल्पांसाठी 1048 कोटी देणार होतात.
  • नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 2826 कोटींची कबुली होती.
  • विमानतळ विस्तारीकरणासाठी 200 कोटीची घोषणा केली होती.
  • औरंगाबाद पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटीची घोषणा केली होती.
  • लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला 279 कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त 12 कोटी
  • 25 हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी 375 कोटींची कबुली होती.
  • जालन्यात सीड पार्क साठी 109 कोटींचा वायदा होता.

दरम्यान यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, "तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत. यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण आपण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे. यंदा औरंगाबादेत येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल 32 देश घेत असतात, असं म्हणतात.. तुमच्या दिल्लीश्वर पातशहा  सवय आहे शब्द फिरवायची आणि विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे, असा टोलाही दानवे यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची राजस्थानच्या अजमेरमध्ये भर पावसात दणदणीत सभा

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke  : म्हाताऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, आश्रमात बसावं, आमचं आम्ही ठरवू; अण्णा हजारेंचं नाव घेताच अभिजीत दीपके काय म्हणाले?
म्हाताऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, आश्रमात बसावं, आमचं आम्ही ठरवू; अण्णा हजारेंचं नाव घेताच अभिजीत दीपके काय म्हणाले?
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Chhatrapati Sambhajinagar Crime: पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! छ. संभाजीनगरमधील नामांकित 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे थेट परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! छ. संभाजीनगरमधील नामांकित 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे थेट परवाने निलंबित

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Embed widget