एक्स्प्लोर

Maratha Kranti Morcha : आजच्या दिवशी निघाला होता राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा'; असं ठरलं होतं नियोजन!

Maratha Kranti Morcha : राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद शहरात निघाला होता.

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावा आणि कोपर्डी अत्याचार घटनेतील (Kopardi Case) आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यात आतापर्यंत 58 शहरात मोर्चे निघाली. तर अजूनही सतत वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन, उपोषण आणि मोर्चे काढले जात आहे. पण, राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद (Aurangabad) शहरात निघाला होता. लाखोच्या संख्येने जमा झालेल्या मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर उतरत समाजाचा आवाज उठवला. पुढे प्रत्येक जिल्ह्यात हे मोर्चे निघाले. विशेष म्हणजे त्यावेळी करण्यात आलेल्या एकूण 15 मागण्यापैकी सात वर्षात फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या आहेत. 

असा निघाला पहिला मोर्चा... 

कोपर्डी अत्याचार घटनेनंतर मराठा समाजात मोठा रोष होता. त्यामुळे या घटनेच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या अनुषंगाने 22 जुलै 2016 रोजी औरंगाबादच्या सिंचन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध मराठा संघटनांचे एकूण 16 पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत कोपर्डी अत्याचार घटनेच्या विरोधात पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने संघर्ष उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 9 ऑगस्ट 2016 रोजी म्हणजेच क्रांती दिनी मोर्चा काढण्याचे ठरले. 'मराठा क्रांती मोर्चा' असे या मोर्चाला नाव देण्याच ठरलं. तसेच सकाळी साडेअकरा वाजता औरंगाबाद शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढायचा ठरले. 

दरम्यान, हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी बैठकीत उपस्थितीत असलेल्या सर्वांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. मोर्चाची परवानगी घेण्याच्या जबाबदारीसह, वर्तमानपत्राला बातम्या देण्याची जबाबदारी चार लोकांना देण्यात आली. तसेच दुसरी बैठक 31 जुलैला देवगिरी कॉलेजमध्ये ठेवण्याचे देखील पहिल्या बैठकीत ठरले. तर या दुसऱ्या बैठकीमध्ये राजकीय मंडळींना स्थान द्यायचे नाही असेही ठरले. तसेच कुणाही राजकीय बांधवांना मोर्चामध्ये सहभागी व्हायचे असेल, तर फक्त मराठा म्हणूनच सहभागी होता येईल अशी आचारसंहिता ठरवण्यात आली. हे मान्य असणाऱ्यांनाच मोर्चात सहभागी होता येईल असे जाहीर करण्यात आले.

अन् पाहता-पाहता लाखोचा जनसमुदाय एकत्र आला...

9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद शहरात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोपर्डी अत्याचार घटनेनंतर मराठा समाजात मोठा रोष आणि संताप त्यावेळी होता. त्यामुळे मोर्चाला गर्दी होईल याचा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात अपेक्षित गर्दीपेक्षा कितपट तरी अधिकची गर्दी झाली. सकाळी 10 वाजेपासून मोर्चेकरी क्रांती चौकात जमा होण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून लोक क्रांती चौकात दाखल होत होते. पाहता-पाहता काही वेळेत लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला. 

मराठा क्रांती मोर्चाने दिले शिस्तीचे धडे...

औरंगाबाद शहरात निघालेल्या पहिल्या मराठा क्रांती मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्याप्रमाणात लोक एकत्र आल्याने पोलिसांची देखील चिंता वाढली होती. पण, प्रत्यक्षात मोर्चाचे ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांवर थोडाही ताण पडला नाही. मोर्चा कसा असावा आणि मोर्चातील शिस्तीचे धडे या राज्याला मराठा क्रांती मोर्चाने दिले. विशेष म्हणजे पुढेही राज्यात निघालेले सर्वच 58 मोर्चे असेच शांतेत निघाले. पण, दुर्दैवाने पुढे याच मराठा क्रांती मोर्च्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप झाले आणि तसेच अनेकांनी स्वतः च्या फायद्यासाठी याचा वापर केल्याचे देखील आरोप झाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार, नवा आयोग नेमून शास्त्रीय सर्वेक्षण करणार; राज्य सरकारचा निर्णय

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
Sanjay Shirsat : उबाठा गटाच्या प्रत्येकाला बोभाटा करण्याची सवय; मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगर; मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका, विनायक राऊतांवर सुमोटो कारवाईची मागणी
उबाठा गटाच्या प्रत्येकाला बोभाटा करण्याची सवय; मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगर; मंत्री संजय शिरसाटांची बोचरी टीका, विनायक राऊतांवर सुमोटो कारवाईची मागणी
Fairness Cream Alert : पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण; FDAचा धक्कादायक अहवाल, राज्यात विक्रीवर बंदी  
पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीममध्ये आढळले मर्यादेपेक्षा चार पट अधिक विषारी धातूंचे प्रमाण; FDAचा धक्कादायक अहवाल, राज्यात विक्रीवर बंदी  

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget