एक्स्प्लोर

Crop Insurance : पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळणार नाही; विमा कंपनीच्या कॉल सेंटरकडून शेतकऱ्यांना अजब उत्तर

Crop Insurance : सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. 

औरंगाबाद : पाऊस (Rain) पडत नसल्याने पिकं मातीमोल होत आहेत. अशातच पीक विमा (Crop Insurance) मिळाल्यास काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना (Farmes) आहे. पण शेतकऱ्यांच्या यांच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याचं काम पीक विमा कंपन्याच्या कॉल सेंटरकडून सुरु आहे. कारण शेतकऱ्यांना कॉल सेंटरकडून मिळणारे उत्तर संभ्रम निर्माण करणारे आहे. सोबतच सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. 

एकीकडे पाऊस नसल्याने डोळ्यादेखत उभं पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हताश होऊन विमा कंपन्यांकडे फोन करत आहेत. मात्र, विमा कंपनीच्या कॉल सेंटरवरचं एक उत्तर शेतकऱ्यांमध्ये अधिक संभ्रम आणि चिंता निर्माण करणारे आहे. त्याचं कारण असं की, शेतकऱ्यांना कॉल सेंटरवरुन जे उत्तर मिळतंय त्यानुसार पाऊस न पडल्याने पिकांचं नुकसान झाल्यास नुकसानभरपाईसाठी शेतकरी पात्र ठरत नाहीत. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे नुकसान झालंय आणि त्याची नुकसान भरपाई द्या, असा कंपनीकडे फोन केला. तसेच निपाणी गावातील आणखी एका शेतकऱ्याने देखील कंपनीकडे असाच फोन केला. मात्र, पाऊस न पडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणार नसल्याचं अजब उत्तर शेतकऱ्यांना देण्यात आले. 

अधिकारी काय म्हणतात? 

यावर आम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास पीक विमा द्यावा लागणार असल्याचं म्हटले आहे. तसेच पिक विमा कंपन्या अशा पद्धतीने कॉल सेंटरवरुन उत्तर देत असतील, तर त्यांना आम्ही लेखी कळवणार असल्याचं ते म्हणाले. तर यावर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतांना असा काही नियम नसून, सरकारी नियमानुसारचं कंपनी काम करत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

कोरडा-ओला दिवस नियमाचा फटका...

बरं एवढं होऊन सरकारी नियमांचा देखील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सरकारच्या नियमानुसार ओला आणि कोरडा दिवस अशी नोंद घेण्यात येत असते. मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. कारण अडीच एमएम पाऊस पडल्यास सरकारी नियमानुसार तो ओला दिवस पकडला जातो, अन्यथा कोरडा दिवस समजला जातो. पण अडीच एमएम पावसात आपण उभा राहिल्यास साधा शर्ट देखील पूर्णपणे ओला होणार नाही. मग पीक कसे जगतील. विशेष म्हणजे 20 दिवस कोरडे दिवस गेल्यावर त्याच दिवशी अडीच एमएम पाऊस झाल्यास आणखी पुढील 21 दिवस कोरडे गेल्यावरचं पीक विमा मिळू शकतो. त्यामुळे, याच नियमामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकरी पीक विमाच्या 25 टक्के अग्रीमपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Weather Update : राज्यात 5 सप्टेंबरनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होणार; भारतीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget