एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वरील अपघातानंतर प्रशासनाची तातडीची बैठक; अपघात टाळण्यासाठी 'या' उपाययोजना आखण्यास सुरू

Samruddhi Mahamarg: बुलढाणामध्ये समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या भीषण अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

Samruddhi Mahamarg:  समृद्धी महामार्गावर एक जुलैच्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी आज बुलढाणा जिल्हा (Buldhana) पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं. यात जिल्ह्यातील आरोग्य समृद्धी महामार्गावरील अधिकारी समृद्धी महामार्ग ज्या पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो त्या पाच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक यांनी या उपायोजनांवर माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कोणत्या उपाययोजना आखण्यात येणार याची माहिती त्यांनी दिली. 

समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या भीषण अपघातानंतर मात्र आता पोलीस प्रशासन परिवहन प्रशासन व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून शक्यतो अपघात होऊच नये यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत तर अपघात झाल्यावर तात्काळ मदत मिळावी यासाठी सुद्धा अनेक पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे 

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कोणत्या उपाय योजना?

- समृद्धी महामार्गावर एन्ट्री पॉईंट पासूनच अनेक साइन बोर्ड लावण्यात येतील. ज्यात मनोरंजनात्मक फलक सुद्धा असणार आहेत

- समृद्धी महामार्गावरील ज्या ठिकाणी अपघाताच्या जास्त घटना घडल्या आहेत. अशा ठिकाणी बंप बसवण्यात येणार आहे ज्यामुळे वाहन चालक सतर्क होईल. 

- समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पाचही पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंग पथक हे गस्त घालत राहतील. 

- अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांची जनजागृती करण्यात येणार आहे. 


बंप म्हणजे काय?

बंप म्हणजे रंबलर स्ट्रिपस. आठ ते दहा छोटे-छोटे गतिरोधक असतात. त्यावरून वाहन नेताना वेग कमी करण्याची गरज नसते. फक्त त्यावरून वाहन गेल्यास धावत्या वाहनामध्ये व्हायब्रेशन तयार करतात. जर वाहन चालकाच्या डोळ्यावर झोप असेल, आळस असेल तर या व्हायब्रेशनने सतर्क होतो. 

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातीलच अपघातांचे प्रमाण जास्त का?

समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 88 किलोमीटरच्या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण हे इतर ठिकाणापेक्षा थोडे जास्तच आहे. सध्या समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीरपर्यंत सुरू झालेला आहे. नागपूर ते भरवीर हे अंतर 600 किलोमीटरचं आहे.  या सहाशे किलोमीटरचा केंद्र किंवा मध्य भाग हा बुलढाणा जिल्ह्याचा 88 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा पट्टा आहे. 

ज्यावेळी एखादे वाहन चालक आपला वाहन घेऊन नागपूरहून निघतो, त्यावेळी तो सलग 300 किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात पोहोचतो किंवा भरवीरकडून नागपूरकडे जाणारा चालक हाही तिनशे किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्याच्या या पट्ट्यात पोहोचतो. सलग तीनशे किलोमीटर वाहन चालवल्याने वाहन चालकाचा मेंदू हा थकलेला असतो. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget