Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा
Samruddhi Highway Potholes : हजारो कोटींचा खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर 6 महिन्यातच खड्डे, अपघाताचा धोका वाढला
![Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा potholes on samruddhi highway within 6 months potholes and bridges are also cracked on highway maharashtra buldhana Marathi News Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/04/c7796d7cf5bac73d0434c2f17684c388169114191221988_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Buldhana News: आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान वापरून आणि 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले आहेत. पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर कुठे खड्डे पडत आहेत, तर कुठे पुलांनाच भेगा पडत आहेत आणि त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई असा 701 किलोमीटरचा असलेला स्वप्नवत वाटणारा हा महामार्ग जवळपास 55 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करून बांधण्यात आलेला आहे. गेल्या 11 डिसेंबर रोजी मोठ्या थाटात या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजेच, नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या महामार्गाला सातच महिने झाले मात्र महामार्गावर आता पॅकेज 6 आणि 7 वर पुलांवर भेगा पडण्याचं आणि खड्ड्यांचं ग्रहण सुरू झालेल आहेत.
पॅकेज 6 हे apko कन्स्ट्रक्शन कंपनीनं तर पॅकेज 7 हे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं याठिकाणी काम केलेलं आहे. समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक अनेक पुलांवर खड्डे पडले आहेत, तर काही पुलांवर भेगासुद्धा पडल्या आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा ही 120 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्यामुळे प्रचंड वेगात जर वाहनाचं चाक खड्ड्यात गेलं तर खूप मोठा झटका बसून वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होऊ शकतो. मेकर नजीक आयसी 11 जवळ एका पुलावर खूप मोठा खड्डा पडला आहे. गेल्या एका महिन्यापासून पडला असल्याचं स्थानिकांनी आणि वाहन चालकांनी एबीपी माझानं सांगितलं आहे.
कालच राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी चर्चा झाली. मात्र समृद्धीचं ग्रहण काही सुटता सुटत नाही, समृद्धी महामार्गावर कधी टायर फुटून अपघात होतात, तर कधी वाहन चालकाला झोप आल्यामुळे आता यात भर पडणार आहे. ती या खड्ड्यांमुळे त्यामुळे समृद्धी महामार्गाकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे.
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळील इंटरचेंजजवळ एका पुलावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकीकडे आजच राज्याच्या विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताची चर्चा झाली असतानाच समृद्धीवर खड्डे पडत असल्याने समृद्धी महामार्गावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?
सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)