एक्स्प्लोर

Aurangabad: शिवसेना मंत्र्याच्या मतदारसंघात पाणी प्रश्न पेटला; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीच आंदोलन

पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीकडून आज भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

Paithan Water Issues: औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला असताना आता ग्रामीण भागात सुद्धा पाणी टंचाईचे चटके जाणवत आहे. अशीच काही परस्थिती रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये पाहायला मिळत आहे. नागरिकांना आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे याच पाण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण ज्या पैठण शहरात आहेत, तिथेच पाणी टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे धरणात मुबलक असा पाणीसाठा असतानाही प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वासामन्य पैठणकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर याच पैठण तालुक्याचे आमदार संदीपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहे. मात्र असे असताना सुद्धा पैठणचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मोर्चा...

औरंगाबाद शहरातील पाणी टंचाईचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. खुद्द मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंची औरंगाबाद शहरात होणाऱ्या सभेला दोन दिवस शिल्लक राहिले असताना, आता ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा मुद्दाही समोर आला आहे. तर ठाकरेंच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जात असल्याने पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण आणखीच तापणार आहे.

पाण्यावरून राजकीय रणकंदन...

पैठण नगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने याठिकाणचा कारभार सद्या प्रशासकाच्या खांद्यावर आहे. प्रशासक लागण्यापूर्वी नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा होता. तर बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. पण आतापर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात कधी नव्हे पाहायला मिळालेल्या पाणी प्रश्नावरून राजकीय रणकंदन पाहायला मिळत आहे. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व माजी नगरसेवक एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सुरु असलेला राजकीय वाद आता ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळत आहे.

यामुळे पाणी टंचाई...

गोदावरी काठावर असलेला आणि जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पैठण शहराला पाण्याची कमतरता नाही. बाजूलाच धरण असून थेट धरणातून पाईपलाईन केलेली आहे. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली असल्याने पूर्णपणे खराब झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे पाईप फुटणे, पाणी पुरवठा वारंवार खंडीत होणे अशा घटना सतत घडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget