एक्स्प्लोर

Aurangabad Agriculture News: ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Agriculture News: चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता

Aurangabad Agriculture News: आधीच अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरिपाचे पीकं हातून गेली आहे. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी (Farmers) रब्बीची पेरणी (Rabbis Sowing) केली असून, पिक बहरलेले आहे. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनमध्ये बोलली जात आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. 

औरंगाबाद पैठण, सिल्लोड ,फुलंब्री, सोयगाव, कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील परिसरात यंदा परतीच्या पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे अनेकांचे हातात आलेले खरीप पिक पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) पाणीपातळी वाढली असून, विहिरींत पाणीसाठा देखील वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीची तयारी केली. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कपाशीची झाडे उपटून टाकली. त्या कपाशीच्या शेतामध्ये मका, ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, आदी पिकांचा पेरा घेतला. पण आता ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली... 

पाणी उपलब्ध असल्याने रब्बी पिकांतून उत्पादनाची आशा वाढीस लागलेली असतानाच ढगाळ वातावरण, धुके, पिकांवरील रोगराई यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणामुळे गव्हाची पेरणीही टाळली आहे. काहींनी गव्हाऐवजी हरभऱ्याला व जनावरांना खाण्यासाठी चारा म्हणून शाळूला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, यंदा पाणीसाठा चांगल उपलब्ध आहे. त्यामुळे खरिपाचे झालेले नुकसान आता रब्बी हंगामातून निघेल अशी अपेक्षा आहे. मात्र आता ढगाळ वातावरण, रोगराई यामुळे पिकांना फटका बसणार असल्याची परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पिकांना मोठा फटका

यावर्षी मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहेत. विशेष म्हणजे अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. कापूस, सोयाबीन यासह फळ पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पिकांसह जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळं पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच रब्बीचे पीक बहरत असतानाच आता ढगाळ वातावरनामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Agriculture News: मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या करडई, तूर आणि सोयाबीनच्या वाणास राष्ट्रीय मान्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून दाखवण्याचा पोलिसांचा कट होता, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आरोपABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 February 2024Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.