एक्स्प्लोर

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपची खेळी; शिवसेना अडचणीत?

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपने नवी खेळी खेळल्याने सत्तेत असलेली शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपनं यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्वप्न पुर्ण करावं असं आवाहन शिवसेनेला केलं आहे. मात्र, या प्रस्तावामुळं आता शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हा वाद गेल्या 28 वर्षांपासून सुरु आहे. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा नारा दिला होता, तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेना संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावरुनच निवडणुका लढतेय. त्यात आता सत्तांतर झालं, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं शिवेसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत, आणि यातच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपनं नवी खेळी केली आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी नव्यानं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं असा प्रस्ताव मांडला आहे. महापालिकेनं तो सर्वसाधारण सभेत मंजूर करुन मुख्यमंत्र्यांना पाठवावा आणि त्याचं स्वप्न पुर्ण करावं असा चिमटा भाजपनं काढला आहे. शिवसेनेला या शहराचं नाव बदलायचं आहे. मात्र, सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्तेत असल्यानं सध्या हा मुद्दा त्यांना अडचणीचा आहे. मात्र, तरीसुद्धा सारवा सारव करणं शिवसेनेकडून सुरू आहे. या आधी 2013 ला आणि त्यानंतर 2016 ला अशा आशयाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. त्यामुळे नव्यानं प्रस्ताव पाठवण्याची गरज नसल्याचं महापौरांच म्हणणं आहे. ही सगळी स्टंटबाजी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं? सर्वसामान्य नागरिकांची याबाबत वेगळी मतं आहे. कुणी विरोध करतंय, तर कोणी प्रथम पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या अशी मागणी करतंय. औरंगाबाद की संभाजीनगर या वादावरुन महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांनी 27 वर्षे राज्य केले. या शहराचं मलिक अबंर यानं ठेवलेलं जुनं नाव म्हणजे खडकी, त्यानंतर औरंगजेब या भागाचा सुभेदार झाला आणि त्यानं या शहराच नाव औरंगाबाद केलं, त्यात 1988 मध्ये बाळासाहेबांनी नारा दिल्यावर शिवसेना, भाजप या शहराला संभाजीनगर म्हणायला लागले. आता महापालिका निवडणुकांच्या समोर पुन्हा नामांतराचा वाद ऐरणीवर आला आहे. वाद सुरुही राहिल मात्र यातून पायाभूत सुविधांचे जे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार आहे का? याचं उत्तर कुणाजवळही नाही. हेही वाचा  - औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी होणार? CAA Protest | आधी नमाज मग कायद्याविरोधात आवाज | औरंगाबाद | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM  06 October 2024Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHASambhajiraje Navi Mumbai : 8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमकManoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
Embed widget