एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
औरंगाबाद-जालना रोडवर तीन महिलांना कारनं चिरडलं; दोघींचा जागीच मृत्यू
लग्नसमारंभासाठी जात असताना औरंगाबाद-जालना रोडवर तीन वृद्ध महिलांना एका कारने उडवलं. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर, एक महिला गंभीर जखमी झालीय. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पलायन केलंय.
![औरंगाबाद-जालना रोडवर तीन महिलांना कारनं चिरडलं; दोघींचा जागीच मृत्यू aurangabad jalna car accident three women killed औरंगाबाद-जालना रोडवर तीन महिलांना कारनं चिरडलं; दोघींचा जागीच मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/08013631/aur-accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना रोडवर धूत हॉस्पिटलसमोर भरधाव ट्रकने तीन महिलांना उडवलं. याच दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक गंभीर जखमी झाली आहे. या महिला लग्नसमारंभासाठी रस्त्याने जात असताना कारने त्यांना उडवलं. हा अपघात पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ झाला. जखमी झालेल्या महिलेवर सामान्य घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन पलायन केलं. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
भरधाव कार चालकाने तीन वृद्ध महिलांना जालना रोडवर चिरडले. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेवर सामान्य घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ झाला. तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70) आणि आशामती विष्णु गायकवाड (वय 40, दोघीही रा. देवठाणा, ता. मंठा, जि. जालना)अशी मृत महिलांची नावे आहेत. तर अहिल्याबाई दादाराव गायकवाड या गंभीर जखमी आहेत.
सोलापुरात एसटी आणि जीपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
अपघातानंतर कारचालकाचे पलायन
जालन्याच्या मंठा तालुक्यातील गंगाधर दादाराव गायकवाड यांच्या मुलाचे जालना रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील कांचन लॉन्समध्ये रविवारी विवाह आहे. त्यासाठी आज दुपारी काकू तुळसाबाई गायकवाड, आशामती विष्णु गायकवाड आणि अहिल्याबाई गायकवाड या एसटीने दुपारी औरंगाबादकडे निघाल्या होत्या. जालना रोडवरील धुत हॉस्पिटलसमोर या तिघीही सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास एसटीतून उतरल्या. यावेळी पायी जात असताना चिकलठाण्याहून सिडकोकडे भरधाव जाणाऱ्या कारचालकाने तिघींना चिरडले. कारचालकाने तिघींना दुरवर फरफटत नेले. या भीषण अपघातात तुळसाबाई, आशामती आणि अहिल्याबाई गंभीर जखमी झाल्या. यात तुळसाबाई आणि आशामती यांचा मृत्यू झाला. तर अहिल्याबाई यांना सामान्य घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुलगा तुळसाबाई यांचा मुलगा दिगंबर दामोदर गायकवाड, पुतण्या गंगाधर दादाराव गायकवाड यांच्यासह नातेवाईकांनी धाव घेतली. दरम्यान अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरुन धुम ठोकली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अपघाताची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Accident at Khandala Ghat | पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात, तीन जणांचा मृत्यू
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion