एक्स्प्लोर

Bacchu Kadu : बच्चू कडू करणार अयोध्या दौरा, प्रभू श्रीराम चरणी मांडणार शेतकऱ्यांच्या व्यथा

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू हे 29 ऑक्टोबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे 29 ऑक्टोबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयीची माहिती बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान 15 ऑक्टोबरला मुंबईत बच्चू कडू यांनी मुंबईत 'मेरा देश मेरा खून' या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेचा दुसरा टप्पा हा अयोध्येमध्ये होणार असल्याचं देखील यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभू श्रीराम चरणी बच्चू कडू मांडणार आहे. त्यासाठी त्यांच्या अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं चित्र आहे. तर अयोध्येला जाऊन शेतकऱ्यांसाठी प्रार्थना बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते अयोध्येला जाऊन करणार आहेत. 

बच्चू कडूंनी काय म्हटलं?

यावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, तकऱ्यांचं मरण होऊ नये म्हणून आम्ही प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत. तिथे ऊस, कापूस, तूर,  सोयाबीन आणि धान आम्ही प्रसाद चढवणार. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रथम स्तरावर या सरकारने घ्यावे म्हणून हा अयोध्या दौरा आहे. आम्ही आर्थिक आरक्षणाची लढाई लवकरच सुरु करु. त्यासाठी आम्ही संपूर्ण भारत फिरणार. शहिदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मेरा देश मेरा खून’ राबवत आहोत. या देशाच्या  स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिलंय. 

हजारोंच्या संख्येने आयोध्येला जाणार - बच्चू कडू

आम्ही हजारोंच्या संख्येने अयोध्येला जाणार आहोत. या सरकारला बुद्धी दे ही प्रार्थना आम्ही प्रभू श्रीरामाकडे करु. शेतकऱ्यांचा विचार करणारं आणि त्यांच्या हिताचं सरकार यावं असं मागण आम्ही तिकडे मागू. अयोध्येमधील शहिदांचं स्मारक व्हावं. यासाठी देखील आम्ही जात आहोत, असं बच्चू कडू म्हणाले. 

'आमचं आंदोलन सरकारच्या बाजूने की विरोधात हे त्यांनी शोधावं'

आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सातत्याने सरकारवर रोष व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळत. यावेळी देखील त्यांनी याच मुद्द्यावर सरकारवर संताप व्यक्त केलाय. आम्ही जे आंदोलन सुरु केलंय ते सरकारच्या बाजूने आहे की त्यांच्या विरोधात हे सरकारने शोधावं. आम्ही मागणी करत आहोत. सरकारमध्ये आहे म्हणून मागणी करू नये असा काही कायदा नाही. सरकारला जर वाटत असेल हे आंदोलन त्यांच्या विरोधात आहे तर त्याची कोणतीही तमा आम्हाला नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघात केला. 

बच्चू कडूंच्या या दौऱ्यामध्ये हजारो शेतकरी देखील सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी राष्ट्रवादी किसान दलने आमंत्रित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संत्राचा मुद्दा हा केंद्र सरकारचा आहे. बांग्लादेश संत्र्यावर आयात शुक्ल लावत असेल तर त्यांच्या मालावरही आपण लावावा, असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण, मंत्री-आमदारांना गावबंदी, सीमेवरील जवानांसारखे कोपऱ्याने नेत्यांना ढकलणार; मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही

व्हिडीओ

Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
Embed widget