एक्स्प्लोर

AMIT SHAH | हिंसक आंदोलनादरम्यान संवाद साधण्यास कमी पडलो : अमित शाह

सीएए कायद्यानं कुणाचंही नागरिकत्व हिरावलं जाणार नाही, असंही ते म्हणाले. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (NRC) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) या दोहोंचा परस्परसंबंध नाही असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. लोकसंख्येची गणना दर दहा वर्षांनी केली जाते.

नवी दिल्ली : देशव्यापी NRC वरून वाद-विवाद करण्याची गरज आता नाही, कारण यावरून अद्याप अद्याप तरी कुठली चर्चा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत बोलले होते ते योग्यच बोलले, त्यावर अजून कॅबिनेट किंवा संसदेत कुठली चर्चा झालेली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. सीएए आणि एनसीआरच्या विरोधात देशभर आंदोलन आणि हिंसाचार सुरु असताना लोकांशी संवाद साधण्यात आम्ही नक्कीच कमी पडलो. हे मान्य करण्यात काही कमीपणा नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एनआरसी, सीएए आणि एनपीआरबाबत सविस्तर भाष्य केले. शाह म्हणाले की, याबाबत विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे. तसंच सीएए कायद्यानं कुणाचंही नागरिकत्व हिरावलं जाणार नाही, असंही ते म्हणाले. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (NRC) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) या दोहोंचा परस्परसंबंध नाही असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. लोकसंख्येची गणना दर दहा वर्षांनी केली जाते. त्यामध्ये विशेष अशी काहीही बाब नाही. काही लोक अकारण भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप अमित शाह यांनी केला. NPR, NRC, CAA वरुन लोक संतापले. कारण त्यांची माथी भडकवण्यात आली. काँग्रेस या कायद्याचं राजकारण करत आहे असाही आरोप अमित शाह यांनी केला. अल्पसंख्यांकाना विरोधकांकडून घाबरवलं जात आहे, असंही अमित शाह म्हणाले. बंगाल आणि आसाम मध्ये नागरिकत्व कायद्याची सर्वाधिक जास्त प्रतिक्रिया अपेक्षित होती. कारण तिथे जास्त लोक बाहेरून आलेत. पण तुलनेने तिथे मोठा हिंसाचार झाला नाही. ज्या राज्यात नागरिकत्व कायद्याचा फार परिणाम नाही तिथेच राजकीय हेतूने आंदोलन होत आहेत, असा आरोप देखील अमित शाह यांनी केला. ज्या राज्यांचा या कायद्याला विरोध आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आपण संवाद साधणार असल्याचे देखील अमित शाह यांनी यावेळी सांगितले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा नेमका काय आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडले का? असा प्रश्न विचारल्यावर शाह म्हणाले की, 'हो, नक्कीच काहीतरी कमतरता राहिली असेल, हे सत्य स्वीकारण्यात मला काहीही अडचण नाही, पण संसदेतील माझे भाषण पाहा, त्यामध्ये मी सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाच्याही नागरिकत्वाला धोका नाही हे स्पष्ट केले आहे'. ते म्हणाले की, एनपीआरमधून काही नावे सुटू शकतात. पण म्हणून त्यांचे नागरिकत्व रद्द करणार नाही. कारण की, ही एनआरसीची प्रोसेस नाही. एनआरसी एक वेगळी प्रक्रिया आहे. एनपीआरमुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही हे मी स्पष्ट करतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana Meet Devendra Fadnavis: पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Horoscope Today 5 June 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Bollywood Superstar Madhuri Dixit Life Story: दूरदर्शननं नाकारलं, पहिला सिनेमाही ठरला सुपरफ्लॉप; पण तरीही 'ती' बनली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'; ओळखलं का कोण?
दूरदर्शननं नाकारलं, पहिला सिनेमाही ठरला सुपरफ्लॉप; पण तरीही 'ती' बनली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'; ओळखलं का कोण?
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget