एक्स्प्लोर

Nilesh Lanke : गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन

Nilesh Lanke : कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या चार तासांपासून हे आंदोलन सुरु आहे.

अहमदनगर : कांदा (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गाई आणि म्हशी घेऊन अहमदनगर मनपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केल्या होत्या. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

निवेदन घ्यायला आले नाही तर आम्ही गेट तोडून आत जाऊ - निलेश लंके

गेल्या चार तासापासून हे आंदोलन सुरु आहे. मात्र आंदोलनाची दखल प्रशासन घेत नाही. प्रशासनाने निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच गेट तोडून आत जाऊ, असा इशारा निलेश लंके यांनी दिला आहे. दरम्यान सरकार आम्हाला 5 रुपये अनुदान देऊन भीक देत असून आम्हाला भीक नको हक्काचं द्या, अशी मागणी लंके यांनी केली असून लंके यांचं आंदोलन सुरूच आहे.

निलेश लंकेंनी पोलिसांना वाटले दूध 

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाकडून बैलगाडी अडवण्यात आली. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास नकार दिल्याने आंदोलकांनी बैलगाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच सोडली. तर यावेळी निलेश लंके यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटले.

शेतकरी आर्थिक संकटात

दरम्यान, निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. दूधाचे भाव गेले वर्षभर सातत्याने कोसळत आहेत. दुधाला किमान 40 रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. सध्या दूधाला मिळणाऱ्या भावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली. परंतू, अनुदानासाठीच्या जाचक अटी व शर्तीमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. नुकतीच केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला असून विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालाच्या चुकीचे आयात-निर्यात धोरण, रासायनिक खते, बी- वियाणे, किटकनाशके, शेती औजारे याच्या माध्यमातून जी.एस.टी. चा शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडलेला आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. देशातील उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ केले जाते. मात्र, देशभरातील जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सरकारला दिसत नाही. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दूध आणि शेतीमालाच्या हमी भावावरून प्रचंड असंतोष आहे. यासाठी अनेक शेतकरी संघटना विविध ठिकाणी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या दूधाला ४० रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, कांदा व इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली. 

आणखी वाचा 

'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : मुंबईत जोरदार पाऊस, पाणी वाढण्याची शक्यता, लोकांनी घराबाहेर पडू नये : अजित पवारBelapur Train Accident : प्रचंड गर्दीमुळे महिलेचा रेल्वे रुळावर अपघात, दोन्ही पाय गमावलेMumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्जThane Railway Heavy Rain  : ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, ठाणे रेल्वे स्थानकावरून लोकल रद्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Sharad Pawar : शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
Embed widget