एक्स्प्लोर

Hivare Bajar : चार महिन्यात केवळ 22 दिवस पाऊस, पण हिवरे बाजारचं परफेक्ट नियोजन, कसा आहे यंदाच्या पाण्याचा ताळेबंद!

Ahmednagar News : 'राज्यातील प्रत्येक गावाने अशापद्धतीने पाण्याचा ताळेबंद आखला तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज भासणार नाही'.

अहमदनगर : यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यात अपेक्षित पाऊस (Maharashtra Rain) झालेला नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पाण्याचा ताळेबंद आखण आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचा कसा वापर करायचा, याबाबत अहमदनगरच्या (Ahmednagar) आदर्श गाव हिवरे बाजारने यंदाही उपलब्ध पाण्याचा ताळेबंद सादर केला आहे. दरवर्षी हिवरे बाजार गावात नवरात्रीच्या सातव्या माळेला पाण्याचा ताळेबंद सादर केला जातो.

नेहमीच राज्यातील गावासमोर वेगवेगळे आदर्श घालून देणाऱ्या आदर्श गाव हिवरे (Hivare Bajar) गावात मागच्या 19 वर्षांपासून पाण्याचा ताळेबंद आखला जातो, जेणेकरून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत नाही. मात्र यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यंदाच्या हिवरे बाजारच्या ताळेबंदानुसार गतवर्षापेक्षा यंदा हिवरे बाजार शिवारात सुमारे 75 कोटी लिटर पाणी (Water Storage) कमी उपलब्ध झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात हिवरे बाजार शिवारात केवळ 22 दिवस पाऊस पडला आहे. यावर्षी डिसेंबरनंतर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसतेय, त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत चारा उत्पादनाला प्राधान्य देऊन मुरघास करण्यावर भर असणार आहे.

हिवरे बाजार गावात  2004 पासून पाणलोटात पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येतो. यावर्षी 22 दिवसांत 538 मिलिमीटर पाऊस पडून 525.15 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. त्यातील 350.11 कोटी लिटर पाणी गावाच्या वापरासाठी उपलब्ध झाले. गावाची वार्षिक गरज 333.32 कोटी लिटर आहे. त्यामुळे 16.80 कोटी लिटर पाणी राखीव ठेवता येणार आहे. गेल्यावर्षी हिवरे बाजार शिवारात 678 मिलिमीटर पाऊस पडून 428.9 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले होते. त्यानुसार हिवरे बाजार गावाने यंदा पाण्याचा ताळेबंद आखला आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार नाही. त्यानुसार राज्यातील प्रत्येक गावाने अशापद्धतीने पाण्याचा ताळेबंद आखला तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज भासणार नाही, असं पोपटराव पवारांनी (Popatrao Pawar)  म्हंटले आहे.

तर दुष्काळी परिस्थिती कधीच उदभवणार नाही

यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हिवरे बाजारमध्ये अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. जरी अतिरिक्त पाणी शिल्लक राहणार असले तरी बाजारात विकणाऱ्या पिकांवर भर न देता जनावरांच्या चारा पिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय हिवरे बाजारने घेतला आहे. सोबतच राज्यातील सद्यस्थित पाहता प्रशासनाने आतापासूनच टंचाई नियोजन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हिवरे बाजार सारखं राज्यातील प्रत्येक गावाने पाण्याचे नियोजन केले तर दुष्काळी परिस्थिती कधीच उदभवणार नाही, असंही पोपटराव पवार म्हणाले. 

हिवरे बाजारच्या पाण्याचा ताळेबंद

  • एकूण पाऊस : 538 मिलिमीटर
  • पावसाचे दिवस : 22
  • उपलब्ध झालेले एकूण पाणी : 525.15 कोटी लिटर.
  • बाष्प होणारे पाणी : 183.80 कोटी लिटर.
  • वाहून जाणारे पाणी: 40.01 कोटी लिटर.
  • जमिनीत मुरणारे पाणी : 89.28 कोटी लिटर.
  • मातीत मुरणारे पाणी:157.54 कोटी लिटर.
  • जमिनीवर साठणारे पाणी : 52.51कोटी लिटर.
  • जलसंधारण कामामुळे मुरणारे अधिकचे पाणी : 50.78 कोटी लिटर.
  • उपलब्ध पाणी (जमा) : 350.11 कोटी लिटर.

इतर महत्वाची बातमी : 

मराठवाड्यासाठी मोठी बातमी! वरील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा दोन दिवसांत निर्णय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget