एक्स्प्लोर

फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी 

मराठी सिनेमासह हिंदी आणि साऊथच्या सिनेमात देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळं वलय निर्माण करणारे अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी यांची ओळख आहे. अतुल कुलकर्णी यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.

मुंबई :  माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा छोटा भाग आहे. माझा व्यवसाय माझं आयुष्य नाही. मग मी जे पाहतो, वाचतो त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. म्हणून फक्त लेखक, कलाकारांनीच नाही तर भूमिका प्रत्येकानेच घ्यावी, असे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. आयुष्य जगताना तुमच्या आजूबाजूची लोक महत्वाची आहे. त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात अतुल कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी अतुल कुलकर्णी म्हणाले की, समाज म्हणून आपण वैचारिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या कुठे पोहोचलोय हे पाहणं गरजेचं आहे. तुमच्या समजुती काय आहेत यावरून लोकं गोष्टी निवडतात. अर्थात निवडीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं. वर वर जे दिसत ते रिफ्लेक्शन असतं. कट्टरपणा कुठल्याही गोष्टीत वाईट असतो, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, कला केवळ विचारांना फुंकर घालते. कलेमध्ये क्रांती करण्याची ताकत नाही. कुठल्याही प्रकरणावर मत व्यक्त करणं किंवा मत ऐकून घेणं हे कुठल्याही सदृढ समाजाच्या लक्षण आहे. आपल्याला विचार निवडीचं स्वातंत्र्य आहे, असं त्यांनी जेएनयू प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. मुलं जन्माला न घालण्याच्या निर्णयाविषयी ते म्हणाले की, कुठलाही एक वाक्य हे विचारातून आले. आपल्याकडे जास्तीत जास्त दहा हजार लोक एका वेळेला एकत्र राहू शकतात. त्या पलीकडे गेलं तर संघर्ष सुरु होतो. आता ज्या परिस्थितीला आपण पोहोचलोय तिथे आपल्याला नवीन नियम करावे लागतील. जुने नियम आपल्याला मोडावे लागतील. लग्न झालं कि मूल जन्माला घालणं बंद करावं लागेल. लग्न झालं म्हणजे मुलं जन्माला घालणे बंधनकारक नाही. आपण नव्या जन्माला सगळं व्यवस्थित देऊ शकतो का? याचा विचार करायला हवा. ते म्हणाले आज शाळा प्रदूषणामुळे बंद करावे लागत आहेत. मुलं जन्माला घातलं की त्याला घर, अन्न लागणार. 2020 मध्ये प्रचंड उलथापालथ होऊ शकते. मनुष्यप्राण्यांनी आणखी मनुष्यप्राणी जन्माला घालणे बंद करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही मुलं जनमेला घातलं नाही, असे अतुल कुलकर्णी म्हणाले. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता, असे ते म्हणाले. आपल्या डाएटविषयी बोलताना ते म्हणाले की, मी मला आवडतं ते सगळं खातो. पण खाण्याच्या वेळा मात्र पाळतो. मला व्यायाम आजिबात आवडत नाही. मात्र आपण आपल्या रोजच्या दैनंदिनीत व्यायान कव्हर करु शकतो, असं त्यांनी सांगितलं. तसंच माझ्या घरात फ्रीज, सोफा, वॉशिंग मशीन अशा अनेक गोष्टी नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget