एक्स्प्लोर

फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी 

मराठी सिनेमासह हिंदी आणि साऊथच्या सिनेमात देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळं वलय निर्माण करणारे अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी यांची ओळख आहे. अतुल कुलकर्णी यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.

मुंबई :  माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा छोटा भाग आहे. माझा व्यवसाय माझं आयुष्य नाही. मग मी जे पाहतो, वाचतो त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. म्हणून फक्त लेखक, कलाकारांनीच नाही तर भूमिका प्रत्येकानेच घ्यावी, असे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. आयुष्य जगताना तुमच्या आजूबाजूची लोक महत्वाची आहे. त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात अतुल कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी अतुल कुलकर्णी म्हणाले की, समाज म्हणून आपण वैचारिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या कुठे पोहोचलोय हे पाहणं गरजेचं आहे. तुमच्या समजुती काय आहेत यावरून लोकं गोष्टी निवडतात. अर्थात निवडीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं. वर वर जे दिसत ते रिफ्लेक्शन असतं. कट्टरपणा कुठल्याही गोष्टीत वाईट असतो, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, कला केवळ विचारांना फुंकर घालते. कलेमध्ये क्रांती करण्याची ताकत नाही. कुठल्याही प्रकरणावर मत व्यक्त करणं किंवा मत ऐकून घेणं हे कुठल्याही सदृढ समाजाच्या लक्षण आहे. आपल्याला विचार निवडीचं स्वातंत्र्य आहे, असं त्यांनी जेएनयू प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. मुलं जन्माला न घालण्याच्या निर्णयाविषयी ते म्हणाले की, कुठलाही एक वाक्य हे विचारातून आले. आपल्याकडे जास्तीत जास्त दहा हजार लोक एका वेळेला एकत्र राहू शकतात. त्या पलीकडे गेलं तर संघर्ष सुरु होतो. आता ज्या परिस्थितीला आपण पोहोचलोय तिथे आपल्याला नवीन नियम करावे लागतील. जुने नियम आपल्याला मोडावे लागतील. लग्न झालं कि मूल जन्माला घालणं बंद करावं लागेल. लग्न झालं म्हणजे मुलं जन्माला घालणे बंधनकारक नाही. आपण नव्या जन्माला सगळं व्यवस्थित देऊ शकतो का? याचा विचार करायला हवा. ते म्हणाले आज शाळा प्रदूषणामुळे बंद करावे लागत आहेत. मुलं जन्माला घातलं की त्याला घर, अन्न लागणार. 2020 मध्ये प्रचंड उलथापालथ होऊ शकते. मनुष्यप्राण्यांनी आणखी मनुष्यप्राणी जन्माला घालणे बंद करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही मुलं जनमेला घातलं नाही, असे अतुल कुलकर्णी म्हणाले. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता, असे ते म्हणाले. आपल्या डाएटविषयी बोलताना ते म्हणाले की, मी मला आवडतं ते सगळं खातो. पण खाण्याच्या वेळा मात्र पाळतो. मला व्यायाम आजिबात आवडत नाही. मात्र आपण आपल्या रोजच्या दैनंदिनीत व्यायान कव्हर करु शकतो, असं त्यांनी सांगितलं. तसंच माझ्या घरात फ्रीज, सोफा, वॉशिंग मशीन अशा अनेक गोष्टी नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget