एक्स्प्लोर

यश याला म्हणतात, ऊसतोड कामगार ते दोन कोटींचा बागायतदार!

सध्या 4 एकरातील डाळिंबांची काढणी सुरु आहे. यातून एक ते सव्वा लाखांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे. एकूण 40 एकरातील बागेतून 2 कोटींपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.

नाशिक : योग्य व्यवस्थापनाला सेंद्रीय शेतीची जोड असेल, तर भरघोस उत्पन्न निश्चितच मिळतं. ही सेंद्रीय शेती फक्त जमिनीचा पोत सुधारत नाही, तर एका ऊसतोड कामगाराला 70 एकराचा बागायतदारही बनवते. नाशिक जिल्ह्यातील रवींद्र पवार हा अनुभव जगत आहेत. आज लाखो-कोटींची उलाढाल करणारा हा शेतकरी, काही वर्षांपूर्वी ऊसतोड कामगार होता हे सांगितलं तर तुमचा विश्वास बनणार नाही. सेंद्रीय डाळिंब पिकाने एका ऊसतोड कामगाराला 70 एकर शेतीचा मालक बनवलं. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील सातमाने गावच्या रवींद्र पवार यांची. काही वर्षांपूर्वी हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ऊसतोड कामगार म्हणून काम करावं लागलं. वडिलोपार्जित ३ एकर शेतात ते याआधी पारंपरिक पीकं घ्यायचे. नंतर 30 गुंठ्यात त्यांनी डाळिंबाची लागवड केली आणि तिथूनच त्यांना प्रगतीचा मार्ग सापडला. Nashik_Pomegranate रवींद्र पवार यांनी संपूर्ण 3 एकरात डाळिंबांची लागवड केली. यातून जो काही नफा मिळत गेला, त्यातून त्यांनी जमीन खरेदी केली आणि आज ते 70 एकर जमिनीचे मालक झाले. डाळिंबांची लागवड करताना त्यांनी इतर डाळिंबांच्या शेतांना भेटी दिल्या. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतात 2 कोटी लिटरचे 2 शेततळं बांधली. ही डाळिंबांची संपूर्ण बाग सेंद्रीय पद्धतीने वाढवलेली आहे. विषमुक्त आणि चांगल्या दर्जाची फळं असल्याने व्यापारीही जागेवर खरेदी करत आहेत. 85 रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळत आहे. सध्या 4 एकरातील डाळिंबांची काढणी सुरु आहे. यातून एक ते सव्वा लाखांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे. एकूण 40 एकरातील बागेतून 2 कोटींपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. यश याला म्हणतात, ऊसतोड कामगार ते दोन कोटींचा बागायतदार! पवार यांनी 70 एकरातील क्षेत्रापैकी 40 एकरात डाळींब, 20 एकरात द्राक्ष आणि 10 एकरात सिताफळ आणि पेरुची त्यांनी लागवड केली आहे. सेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने फळांवर रोगांचा प्रादुर्भाव होणं कमी झालं आहे. फळांचा दर्जा उत्तम असल्याने, त्यांना निर्यातीसाठी पाठवलं जातं. आता रविंद्र यांची मुलं ही शेती सांभाळतात. डाळिंबांच्या झाडांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी, पांढऱ्या नेटचा वापर केला आहे. बागेच्या व्यवस्थापनापासून विक्रीपर्यंतचं सगळं नियोजन ते करतात. यश याला म्हणतात, ऊसतोड कामगार ते दोन कोटींचा बागायतदार! अशाच वेगवेळ्या प्रयोगांमुळे पवार यांच्या शेतीची आणखी भरभराट होत आहे. योग्य नियोजन आणि सेंद्रीय पद्धतीच्या वापरामुळे रवींद्र पवार यांना हे यश मिळवता आलं. त्यांची ही सेंद्रीय शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरते आहे. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
Horoscope Today 24 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget