![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shri Krishna Janmastami 2021: या वेळी जन्माष्टमी इतकी खास का? जाणून घ्या
Importance of Shri Krishna Janmastami 2021: हिंदू दिनदर्शिकेनुसार, कृष्ण जन्माष्टमीचे उपवास आणि पूजा 30 ऑगस्ट रोजी होईल. यावेळी श्री कृष्ण जन्माष्टमीचा योग खूप खास आहे. जाणून घ्या ते इतकं खास का आहे?
![Shri Krishna Janmastami 2021: या वेळी जन्माष्टमी इतकी खास का? जाणून घ्या shri krishna janmastami 2021 the coincidence of krishnashtami after 101 years in jayanti yoga know these importance Shri Krishna Janmastami 2021: या वेळी जन्माष्टमी इतकी खास का? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/29/0c20eeee60074a0479fac6a14e7fdd9a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Importance of Shri Krishna Janmastami 2021: वर्ष 2021 मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी 30 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, जयंती योगाचा हा अत्यंत दुर्मिळ योगायोग 101 वर्षांनंतर घडत आहे. यावेळी या जयंती योगात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. श्रीमद् भागवत पुराणानुसार श्रीकृष्णचा जन्म या महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथी, सोमवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता.
ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, यावेळी श्री कृष्ण जन्माष्टमी 30 ऑगस्ट सोमवारी या महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आहे. चंद्र वर्ष राशीत राहील. रोहिणी नक्षत्राचा प्रवेश 30 ऑगस्ट रोजी सकाळी 6.49 वाजता होईल. अष्टमीची तारीखही सोमवारी मध्यरात्री 12.24 पर्यंत राहील. त्यानंतर नवमीला सुरुवात होईल. अशाप्रकारे अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि सोमवार असा दुर्मिळ योगायग येणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 101 वर्षांनंतर हा दुर्मिळ योगायोग येत आहे. पंचांगानुसार, अष्टमी तिथी 29 ऑगस्ट रोजी रात्री 10.10 वाजता होईल.
अशा परिस्थितीत, जन्माष्टमीच्या वेळी या अनेक विशेष योगायोगांमुळे खूप दिवस असणार आहे. असे मानले जाते की जन्माष्टमीची अशा प्रकारे विशेष पूजा करून भगवान श्रीकृष्ण भक्तांना अपार आशीर्वाद देतात. यासह भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
लोक तीन जन्मांच्या पापातून मुक्त होतात
निर्णय सिंधू नावाच्या पुस्तकानुसार, जेव्हा जेव्हा जन्माष्टमीच्या दिवशी असे योगायोग येतो तेव्हा भक्तांनी ही संधी दवडू नये. ही एक धार्मिक श्रद्धा आहे की या संयोजनात जन्माष्टमीचे व्रत करून श्रीकृष्णाची पूजा केल्यास, एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून किंवा नकळत तीन जन्मांत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते.
संतती प्राप्तीसाठी जन्माष्टमी व्रत विशेष आहे
या विशेष आणि दुर्मिळ योगायोगात, ज्यांना मुले होण्याची इच्छा आहे त्यांनी उपवास पाळला पाहिजे. अशा स्थितीत महिलांनी या दिवशी भगवान श्री कृष्णाचे बाल रूप असलेल्या गोपालाची पूजा करावी, पंचामृताने स्नान केल्यानंतर, नवीन कपडे परिधान करून गोपाळ मंत्राचा जप करावा. यामुळे संतती प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)