एक्स्प्लोर

आरोग्यासाठी फायदेशीर काढ्याच्या अतिसेवनाने उद्भवतात 'या' समस्या; दिवसातून इतक्या वेळा सेवन फायदेशीर

कोरोनावर काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्रास काढ्याचं सेवन केलं जातं.

मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनात काढ्याचा समावेश केला आहे. असं सांगण्यात येत की, काढा फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करत नाही. तर आरोग्याच्या इतरही समस्या दूर करण्यासाठी काढा फायदेशीर ठरतो. पंरतु, ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट... तसचं काहीसं काढ्याच्या बाबतमीत झाल्याचं दिसून येत आहे. काढ्याच्याही अतिसेवनानेही अनेक साइड इफेक्टचा सामना करावा लागतो. अशातच दिवसातून किती वेळा आणि किती प्रमाणात काढा पिणं फायदेशीर ठरतं. हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे.

एका दिवसात काढ्याचं प्रमाण किती असावं?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काढ्याचं प्रमाण आयुर्वेदिक शरीरानुसार ठरते. आयुर्वेदात शरीराचे तीन प्रकार सांगण्यात आले आहे. वात, पित्त आणि कफ. त्यानुसार, आपलं शरीरा या तीनपैकी कोणत्यातरी एका प्रवृत्तीचं असतं. याचाच अभ्यास करून शरीरातील दोष, मानसिक अवस्था आणि स्वभाव ओळखण्यास मदत होते.

वात - जर तुमचं शरीर या प्रकारात येत असेल तर काढ्याचं सेवन दिवसातून दोन वेळा करणं फायदेशीर ठरतं. वात प्रकारात येणारे लोकांनी आपल्या काढ्यात थोड्या तुपाचाही समावेश करावा. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतं.

पित्त - पित्त शरीर असणाऱ्या लोकांनी काढा दिवसातून एकदाच घ्यावा. त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ नये. याव्यतिरिक्त त्यांनी अनोशापोटी काढ्याचं सेवन करू नये. पित्त शरीर असणाऱ्या लोकांसाठी काढा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे, संध्याकाळ.

कफ - दिवसातून 2 ते 3 वेळा कफ शरीर असणाऱ्या व्यक्ती काढ्याचं सेवन करू शकतात. अशा लोकांना व्हायरल आजार होण्याची भिती जास्त असते. त्यामुळे काढा त्यांच्या अमृत असतं, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा फायदेशीर; असा करा तयार

पाहा व्हिडीओ : आयुर्वेदिक काढ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावं?, डॉ शिवरत्न शेटे यांचा सल्ला

काढ्याच्या अतिसेवनाने होणारे साइडइफेक्ट्स

काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे काढ्याच्या अतिसेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन शरीराला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही दररोज काढ्याचं सेवन करत असाल आणि तुम्हाला समस्या जाणवू लागल्या तर समजून जा की, तुम्ही काढ्याचं अतिसेवन करत आहात. जर तुम्हाला नाकातून रक्त येणं, लघवीला त्रास होणं, तोंड येणं (माऊथ अल्सर), पित्त होणं आणि पोटात गॅस होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतं.

काढ्याचं प्रमाण किती असावं?

काढ्याचं सेवन करणाऱ्या लोकांनी काढ्याचं प्रमाणंही मर्यादीत ठेवणं गरजेचं असतं. 50 मिलीलीटर पेक्षा जास्त काढ्याचं सेवन करू नये. 100 मिलीलीटर पाण्यात काढ्यात घालणारे पदार्थ घालून उकळण्यास ठेवा. ज्यावेळी हे पाणी उकळून 50 मिलीलीटर होईल. त्यावेळी त्याचं सेवन करा.

(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget