एक्स्प्लोर

आरोग्यासाठी फायदेशीर काढ्याच्या अतिसेवनाने उद्भवतात 'या' समस्या; दिवसातून इतक्या वेळा सेवन फायदेशीर

कोरोनावर काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्रास काढ्याचं सेवन केलं जातं.

मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काढा अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनात काढ्याचा समावेश केला आहे. असं सांगण्यात येत की, काढा फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करत नाही. तर आरोग्याच्या इतरही समस्या दूर करण्यासाठी काढा फायदेशीर ठरतो. पंरतु, ते म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट... तसचं काहीसं काढ्याच्या बाबतमीत झाल्याचं दिसून येत आहे. काढ्याच्याही अतिसेवनानेही अनेक साइड इफेक्टचा सामना करावा लागतो. अशातच दिवसातून किती वेळा आणि किती प्रमाणात काढा पिणं फायदेशीर ठरतं. हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे.

एका दिवसात काढ्याचं प्रमाण किती असावं?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काढ्याचं प्रमाण आयुर्वेदिक शरीरानुसार ठरते. आयुर्वेदात शरीराचे तीन प्रकार सांगण्यात आले आहे. वात, पित्त आणि कफ. त्यानुसार, आपलं शरीरा या तीनपैकी कोणत्यातरी एका प्रवृत्तीचं असतं. याचाच अभ्यास करून शरीरातील दोष, मानसिक अवस्था आणि स्वभाव ओळखण्यास मदत होते.

वात - जर तुमचं शरीर या प्रकारात येत असेल तर काढ्याचं सेवन दिवसातून दोन वेळा करणं फायदेशीर ठरतं. वात प्रकारात येणारे लोकांनी आपल्या काढ्यात थोड्या तुपाचाही समावेश करावा. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतं.

पित्त - पित्त शरीर असणाऱ्या लोकांनी काढा दिवसातून एकदाच घ्यावा. त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ नये. याव्यतिरिक्त त्यांनी अनोशापोटी काढ्याचं सेवन करू नये. पित्त शरीर असणाऱ्या लोकांसाठी काढा पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे, संध्याकाळ.

कफ - दिवसातून 2 ते 3 वेळा कफ शरीर असणाऱ्या व्यक्ती काढ्याचं सेवन करू शकतात. अशा लोकांना व्हायरल आजार होण्याची भिती जास्त असते. त्यामुळे काढा त्यांच्या अमृत असतं, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा फायदेशीर; असा करा तयार

पाहा व्हिडीओ : आयुर्वेदिक काढ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावं?, डॉ शिवरत्न शेटे यांचा सल्ला

काढ्याच्या अतिसेवनाने होणारे साइडइफेक्ट्स

काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे काढ्याच्या अतिसेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन शरीराला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही दररोज काढ्याचं सेवन करत असाल आणि तुम्हाला समस्या जाणवू लागल्या तर समजून जा की, तुम्ही काढ्याचं अतिसेवन करत आहात. जर तुम्हाला नाकातून रक्त येणं, लघवीला त्रास होणं, तोंड येणं (माऊथ अल्सर), पित्त होणं आणि पोटात गॅस होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतं.

काढ्याचं प्रमाण किती असावं?

काढ्याचं सेवन करणाऱ्या लोकांनी काढ्याचं प्रमाणंही मर्यादीत ठेवणं गरजेचं असतं. 50 मिलीलीटर पेक्षा जास्त काढ्याचं सेवन करू नये. 100 मिलीलीटर पाण्यात काढ्यात घालणारे पदार्थ घालून उकळण्यास ठेवा. ज्यावेळी हे पाणी उकळून 50 मिलीलीटर होईल. त्यावेळी त्याचं सेवन करा.

(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget