एक्स्प्लोर

Health Tips : मूळव्याध हा आजार नेमका कशामुळे होतो? मूळव्याध टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तरूणाईत मूळव्याधाचे प्रमाण वाढले आहे.

Health Tips : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होतात. आणि या बदलांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रोजच्या जीवनात बदलत जाणाऱ्या सवयींमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. परिणामी, अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.    

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तरूणाईत मूळव्याधाचे प्रमाण वाढले आहे. मूळव्याध नेमका का होतो? याचं कारणं कोणती? या संदर्भात सांगताना, डॉ. अभिजित सावंत (मूळव्याध विशेषज्ज्ञ, चिपळूण) सांगतात की, दिनश्चर्येत झालेल्या बदलांमुळे तसेच, योग्य आहार न घेतल्यास मूळव्याधाचा त्रास जाणवतो.   

मूळव्याधाची लक्षणं नेमकी कोणती? 

शौचाच्या मार्गे सूज येणं, शौचाच्या मार्गातून रक्तस्राव होणं, शौच करताना अडखळल्यासारखं वाटणं, आग होणं, जळजळणं, खाज सुटणं यांसारखी लक्षणं मूळव्याधातून जाणवतात.

मूळव्याधाची लक्षणं कोणत्या कारणामुळे जाणवतात? 

  • सर्वात पहिलं कारण म्हणजे आहार आणि विहार. आपण दिवसभर करत असलेली दिनश्चर्या. आणि आपण घेत असलेला आहार या गोष्टीत आलेली विषमता यामुळे या आजाराचं प्रमाण जास्त वाढलं आहे. 
  • दररोजच्या लाईफस्टाईलमुळे हे आजार दिसून येतात. 
  • आहारात कमी घेत असलेले तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरचे अतिशय कमी प्रमाणात सेवन तसेच भाज्या, फळभाज्यांचं कमी प्रमाणात सेवन, कमी प्रमाणात पाणी पिणे यांसारख्या गोष्टींमुळे खाल्लेलं अन्न पचत नाही. अपचन होतं आणि बद्धकोष्टता निर्माण होते. 
  • बरेचजण एसीमध्ये काम करतात. 8-10 तास कंप्युटरसमोर काम केल्यामुळे शरीराची कमी हालचाल होते. तसेच, व्यायाम न केल्यामुळे, खाल्लेलं अन्न न पचल्यामुळे हे आजार आढळून येतात. 

मूळव्याध टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?

  • नियमित फायबर्स, भाज्या, पालेभाज्या, फळांचा समावेश जेवणात असायलाच हवा. 
  • 3-5 लीटर पाण्याचे सेवन करावे. 
  • अति प्रमाणात चहा, कॉफी यांचं सेवन टाळलं पाहिजे. 
  • मद्यपान कमी करणे. यांसारख्या सवयींमुळे बद्धकोष्टतेचा त्रास होतो. बद्धकोष्टता हा मूळव्याधाचा जन्मदाता आहे. 

मूळव्याधाचा आजार टाळण्यासाठी नियमितपणे व्यायामाला जाणं गरजेचं आहे. धावणं, पळणं किंवा जिममध्ये जाणं या गोष्टी शरीरासाठी गरजेच्या आहेत. स्वत:साठी एक तास किमान घालवला पाहिजे. या एक तासामध्ये जर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली तर तुमचं पचन सुरळीत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शौचास नियमित होतं. आपल्याला कोणत्याह प्रकारचा जोर करावा लागत नाही. शौचास जोर न करावा लागल्यामुळे आपल्याला मूळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी आजारांपासून लांब राहता येतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. 

मूळव्याध झाल्यास 'हे' उपाय नक्की करा 

मूळव्याध हा आजार जर तुम्हाला आढळला किंवा या संबंधित लक्षणं आढळली तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. बरेचदा रूग्ण मेडिकलमधून एखादं औषध खरेदी करतो. आणि या आजारातून जरा फरक आला तर टाळतो. मात्र, असे न करता. सर्वात आधी डॉक्टरांकडे जाऊन या आजाराचं निदान करून घेणं गरजेचं आहे. आणि नेमकं निदान झाल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचा आहार घेतला, कोणत्या प्रकारची दिनश्चर्या केली तर आपल्याला बरं वाटेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. 

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या बातम्या : 

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget