एक्स्प्लोर

Kidney Problem : किडनीच्या रुग्णांनी चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका; आरोग्याला पोहोचू शकतो गंभीर धोका

Kidney Problem : मूत्रपिंड आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. त्यामुळे किडनीशी संबंधित छोट्याशा समस्यांकडेही दुर्लक्ष करता येत नाही.

Kidney Problem : किडनीचा त्रास (Kidney Problem) हा गंभीर आजारांपैकी एक आहे. जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याचे कार्य सुधारण्यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मूत्रपिंड आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. त्यामुळे किडनीशी संबंधित छोट्याशा समस्यांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ टाळणं गरजेचं आहे. यामध्ये जास्त सोडियम असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, कार्बोनेटेड पेये आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आहे. जीवनशैली (Lifestyle) आणि आहारात (Food) बदल करून किडनीचे आजार टाळता येऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

लोणचे (Pickle)

किडनीच्या रुग्णांनी चुकूनही लोणच्याचं सेवन करू नये. याचं कारण म्हणजे लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तुम्ही किडनीचे रुग्ण असाल तर लोणच्यापासून अंतर ठेवा.

उच्च प्रथिने (High Protein)

प्रथिने आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहेत. पण, प्रोटीनचं जास्त सेवन केल्याने आपल्या किडनीला धोका पोहोचतो. जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनीवर दबाव येतो. बीन्स, मसूर आणि इतर उच्च प्रथिनयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणातच खा.

केळी (Banana)

केळ्यांमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळेच किडनीच्या रुग्णांनी केळ्याचे सेवन करू नये. त्याऐवजी तुम्ही अननस खाऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे किडनी व्यवस्थित काम करते.

बटाटा (Potato)

बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. बटाटे वापरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. तथापि, सर्व पोटॅशियम बाहेर येण्यास सक्षम नाही. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी जास्त बटाटे खाऊ नयेत.

कॅफिन

याशिवाय किडनीच्या रुग्णांनीही कॅफिनपासून दूर राहावे. शरीरातील कॅफीनचे प्रमाण जास्त असल्याने शरीर निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचाही धोका असतो. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याचा किडनीवर दबाव पडतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Embed widget