एक्स्प्लोर

आमिर खानसोबत लगान सिनेमात झळकलेली अभिनेत्री कुठे गायब? वयाची 44 वर्षे उलटली तरीही अविवाहित

South Cinema why did gracy singh leave bollywood : आमिर खानसोबत लगान सिनेमात झळकलेली अभिनेत्री कुठे गायब? वयाची 44 वर्षे उलटली तरीही केलं नाही लग्न

South Cinema why did gracy singh leave bollywood : लगान हा सिनेमा आमिर खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, ज्याला प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. असं असलं तरी, आज आपण या चित्रपटातील नायिकेबद्दल बोलणार आहोत, जिने आपल्या अभिनयाने चित्रपटाला आणखी दमदार बनवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, आमिरची ती गौरी आता कुठे आहे आणि कशी दिसते? ग्रेसी सिंह या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आमिर खान, अजय देवगण, संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये लगान, मुन्ना भाई एमबीबीएस आणि गंगाजल यांचा समावेश होतो.

आमिर आणि ग्रेसी सिंहचा लगान हा चित्रपट 2001 साली ऑस्करसाठी नामांकन मिळवून गेला होता. तरीदेखील, त्या हळूहळू इंडस्ट्रीमधून गायब झाल्या. आज आपण जाणून घेऊ की, यशस्वी करिअर घडवण्याऐवजी त्या का लाईमलाइटपासून दूर गेल्या. सांगायचं झालं तर लगानच्या काळात ग्रेसी सिंह वयाच्या 20-21 वर्षांच्या होत्या आणि आता त्या 44 वर्षांच्या झाल्या आहेत. मात्र, 44 वर्षांच्याही वयात त्या खूप आकर्षक दिसतात. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर जाऊन ग्रेसीने द प्लॅनेट्स या डान्स ग्रुपसोबत टूर करत नृत्यकला क्षेत्रात करिअर सुरू केलं. त्यांनी 1997 मध्ये अमानत या दूरदर्शन मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली होती. पण त्यांना खरी ओळख मिळाली लगान: वन्स अपॉन ए टाइम इन इंडिया या ऐतिहासिक क्रीडा-नाटक चित्रपटातून.

लगान हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता, तर आमिर खानने सिनेमाची निर्मिती केली होती. या चित्रपटात ग्रेसीने आपल्या साधेपणाने आणि निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि मदर इंडिया आणि सलाम बॉम्बेनंतर सर्वोत्तम परदेशी भाषेच्या श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला. ग्रेसी सिंह यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र, त्या आपलं यश टिकवून ठेवू शकल्या नाहीत. त्यांनी अनिल कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत अरमान चित्रपट केला, पण तो फ्लॉप ठरला. त्यानंतर त्यांनी चंचल, देशद्रोही आणि देख भाई देख सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु हे चित्रपट प्रेक्षकांना भावले नाहीत आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

बॉलिवूडमध्ये सतत अपयश आल्यानंतर ग्रेसीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि बंगाली चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. पण तिथेही त्या फार टिकू शकल्या नाहीत. अखेर 2013 साली त्यांनी ब्रह्मकुमारी विश्व आध्यात्मिक विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी तिथल्या नियमांचं पूर्ण पालन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ब्रह्माकुमारीत सहभागी झाल्यानंतर ग्रेसी सिंह यांनी एका पोर्टलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं – "मला येथे  सुरक्षा, शांती, आनंद, समज, स्वीकार आणि सहकार्याचा अनुभव आला. मी येथे (ब्रह्मकुमारी विश्व आध्यात्मिक विद्यापीठात) जगभरातील विनम्र, दयाळू आणि समजूतदार लोकांना भेटले."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gracy Singh (@iamgracysingh)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक, पोलिसांसमोर विष पिल्याचं नाटकही केलं, पण आता मुसक्या आवळल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या
अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या
अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या
पाऊस बनलाय वैरी, लातुरात बचाव पथकांना पाचारण,धाराशिव, बीडसह उर्वरित भागात बिकट अवस्था
पाऊस बनलाय वैरी, लातुरात बचाव पथकांना पाचारण,धाराशिव, बीडसह उर्वरित भागात बिकट अवस्था
डिव्हायडर धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी, मृतांच्या हातातील बँडने संशय वाढला
डिव्हायडर धडक देत भरधाव थार उलटली, दोन तरुण आणि तीन तरुणींचा मृत्यू; मृतांमध्ये न्यायाधीशांची मुलगी, मृतांच्या हातातील बँडने संशय वाढला
मेट्रोच्या ट्रॅकवर साळिंदर, ट्रेनला लागला ब्रेक; पकडताना वन विभाग पथकातील कर्मचारी घसरून पडला
मेट्रोच्या ट्रॅकवर साळिंदर, ट्रेनला लागला ब्रेक; पकडताना वन विभाग पथकातील कर्मचारी घसरून पडला
Ajit Pawar : पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांचा पूरग्रस्तांशी संवाद
पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अजित पवारांचा पूरग्रस्तांशी संवाद
Embed widget