एक्स्प्लोर

'लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' भाजप नेत्याच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची सडेतोड प्रतिक्रिया

Riteish Deshmukhs Sharp Reply to BJP Leader: रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये राजकीय वाद. रितेश देशमुख यांचे संयमित पण खणखणीत प्रत्युत्तर.

Riteish Deshmukh slams Ravindra Chavan: महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने संयमित पण तितक्याच खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 'लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही', असे रितेश देशमुख याने म्हटले आहे. रितेशने मंगळवारी सकाळी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला.

लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी त्यांनी सभा घेत भाषण केलं.  उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वक्तव्य केलं. यामुळे लातुरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे.  काँग्रेसमधून सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

रविंद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

भाषण करताना रविंद्र चव्हाण म्हणाले, "लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही". त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. 

रितेश देशमुखांची प्रतिक्रिया समोर

यावेळी विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. "दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र".  त्यानं मोजक्या शब्दांत सणसणीत उत्तर दिलं.  रितेशनं हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात शेअर केला आहे.  या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थन दर्शवलं.

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया 

रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली.  ते म्हणाले, "स्व.  विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कुणी निर्माण झाला नाही.   अनेक जण या ठिकाणी इच्छा बाळगून आले. परंतु, स्वाभिमानी  लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.  विलासराव देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं.  आज सत्तेचा माज असलेले  भाजप नेते लातूरमध्ये येऊन बरळून जातात की विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या गेल्यात.  त्यांना काय समजणार विलासराव देशमुख यांचं लातूरकरांसोबत असलेलं नातं.  भाजपवालो याद राखा, याचा करारा जवाब मिलेगा".

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
'...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
Jai Jai Swami Samarth:अंधार होताच इरा गायब, दिवे लागले तर स्वामीही नाहीत! अघटीत घटनेने अक्कलकोट हादरणार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
अंधार होताच इरा गायब, दिवे लागले तर स्वामीही नाहीत! अघटीत घटनेने अक्कलकोट हादरणार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला...
विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांचा प्रभाव? नास्तिक होण्याचा प्रवास सांगत म्हणाले...
Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
Embed widget