‘धुरंधर 2’ ठरणार पहिल्यापेक्षा वादळी? रणवीर सिंहचा नवा अवतार बॉक्स ऑफिस हादरवणार; या 5 कारणांमुळे वाढली उत्सुकता
पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी असला तरी कथानकातील थरार कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशानंतर आता ‘धुरंधर 2’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला, त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वेल किती मोठा ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी असला तरी कथानकातील थरार कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ‘धुरंधर 2’ पाहण्याची पाच मोठी कारणे.
1. रणवीर सिंहचा दमदार अवतार
रणवीर प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा दाखवतो. ‘धुरंधर’मधील त्याचा लूक आणि अॅक्शन प्रेक्षकांना भावला होता. सिक्वेलमध्ये त्याचा आणखी अवतार आणखी आक्रमक असेल असे सांगण्यात आले आहे.
2. स्टारकास्टची मजबूत कामगिरी
पहिल्या भागातील कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला मोठे यश मिळाले. यावेळीही कलाकारांची प्रभावी कामगिरी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा आहे. शिवाय चित्रपटांमध्ये असणारी धमाकेदार आणि खिळवून ठेवणारी ऍक्शन हे ही महत्वाचे कारण समजले जात आहे.
3. हमजा अली मजारीची पुढची कथा
रणवीर साकारणारा हमजा अली मजारी हा भारतीय गुप्तहेर पाकिस्तानमध्ये गेलेला दाखवण्यात आला होता. दुसऱ्या भागात त्याची खरी ओळख आणि मिशन अधिक स्पष्टपणे उलगडणार आहे.
4. कथेशी प्रेक्षकांचा कनेक्ट
पहिल्या भागाची कथा वास्तवाशी जोडलेली वाटल्याने प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली. त्यामुळे पुढील भागाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
5. वाढलेला अॅक्शन आणि थरार
पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर धुमाकूळ घातला. ‘धुरंधर 2’मध्ये आणखी मोठा अॅक्शन स्केल आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळतील, अशी चर्चा आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर माधवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
























