एक्स्प्लोर

Pathaan Box Office Collection: तिकीट दर कमी केल्याचा 'पठाण'ला फायदा? काय सांगते आकडेवारी? जाणून घ्या

27 दिवसांमध्ये पठाण (Pathaan) चित्रपटाच्या तिकीटाची किंमत अनेकदा कमी करण्यात आली. तिकीट दर कमी केल्याचा पठाण या चित्रपटाला फायदा झाला का? याबद्दल जाणून घेऊयात...

Pathaan Box Office Collection: सध्या देशभरात पठाण (Pathaan) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पठाण या हिंदी चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला.  शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट रिलीज होऊन 27 दिवस झाले आहेत. या 27 दिवसांमध्ये पठाण चित्रपटाच्या तिकीटाची किंमत अनेकदा कमी करण्यात आली. तिकीट दर कमी केल्याचा पठाण या चित्रपटाला फायदा झाला का? याबद्दल जाणून घेऊयात...

16 फेब्रुवारीला तिकीट दर केला होता कमी 


16 फेब्रुवारीला पठाण या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर  500 कोटींचा टप्पा पार केला. त्याच दिवशी यशराज फिल्म्सनं या चित्रपटाचा तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 17 फेब्रुवारीला पठाण या चित्रपटाचा तिकीट दर 110 रुपये करण्यात आला. 17 फेब्रुवारीला या चित्रपटानं 2.50 कोटींची कमाई केली होती. तिकीट दर कमी करुनही या चित्रपटानं 10 कोटींचे कलेक्शन देखील केले नाही. त्यामुळे इतर दिवसांच्या कलेक्शनच्या तुलनेत 17 फेब्रुवारीला तिकीट दर कमी केल्यानं देखील पठाणला फारसा फायदा झालेला नाही, असं म्हणता येईल. 

18 आणि 19 फेब्रुवारीला 200 रुपये तिकीट


18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला पठाणचा तिकीट दर 200 रुपये करण्यात आला होता. 18 तारखेला शनिवार आणि 19 तारखेला रविवार होता. वीकेंड असल्यानं तिकीटांचे दर कमी करण्यात आले होते. तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार,  या चित्रपटानं 18 तारखेला  3.25 कोटींची कमाई केली. तर 19 फेब्रुवारीला या चित्रपटानं 4.15 कोटींची कमाई केली. 17 आणि 20 फेब्रुवारीचं कलेक्शन पाहता हे कलेक्शन जास्त आहे. त्यामुळे वीकेंडला  200 रुपये केल्याचा पठाण चित्रपटाला फायदा झाला. 

20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीचे तिकीट दर 


20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान पठाण हा चित्रपट 110 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, काल (20 फेब्रुवारी) या चित्रपटानं  1.20 कोटींची कमाई केली. आता 21, 22 आणि 23 तारखेला हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

पहिल्या आठवड्यात दणक्यात सुरुवात पण नंतर मात्र कमाईला ब्रेक

पठाण या चित्रपटानं पहिल्या आठड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. रिपोर्टनुसार, रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतात 55 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 70 आणि तिसऱ्या दिवशी 39 कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं जवळपास 300 कोटी कमाई  केली. पण पहिल्या आठवड्याच्या तुलनेत या चित्रपटानं केल्या काही दिवसांमध्ये कमी कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याचा उत्साह, चित्रपटाचे प्रमोशन, चित्रपट रिलीज होण्याआधी झालेली कॉन्ट्रोव्हर्सी या सर्व कारणांमुळे या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात जास्त कमाई केली, असं म्हटलं जात आहे. पण पहिल्या आठवड्यानंतर या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागला आहे, असंही म्हणता येईल. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget