एक्स्प्लोर

'ऐ मोहब्बत तिरे अंजाम पे रोना आया', कहाणी त्या गीतकाराची ज्याने बॉलिवूडला प्रेम करणं शिकवलं

Shakeel Badayuni: असं म्हणतात एखाद्या शायरची गोष्ट त्याच्या जन्मापासून सुरू होते, मात्र ही गोष्ट त्याच्या मृत्यूनंतर संपत नाही. त्याचे शब्द  काळ आणि वयाच्या मर्यादा ओलांडून त्यांची स्मृती जिवंत ठेवतात.

Shakeel Badayuni Death Anniversary: असं म्हणतात एखाद्या शायरची गोष्ट त्याच्या जन्मापासून सुरू होते, मात्र ही गोष्ट त्याच्या मृत्यूनंतर संपत नाही. त्याचे शब्द  काळ आणि वयाच्या मर्यादा ओलांडून त्यांची स्मृती जिवंत ठेवतात. कोणीतरी म्हटलंच आहे, कवी जन्माला येतात पण मरत नाहीत. आज आपण अशाच एका, कवी, शायर आणि गीतकाराबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या बद्दल असं बोललं जात की, त्यांच्या गीतांनी बॉलिवूडला प्रेम करणं शिकवलं. या सुप्रसिद्ध गीतकाराचे नाव आहे शकील बदायुनी. शकील बदायुनी यांची आज (20 एप्रिल) पुण्यतिथी आहे. शकील बदायुनी यांचे नाव ऐकताच त्यांनी लिहिलेली गाणी न कळत आठवू लागतात. क्वचितच लोकांना माहित असेल की, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गीतकार म्हणून नाही तर दिल्लीतील पुरवठा विभागातील अधिकारी म्हणून सुरू केली होती.  20 एप्रिल 1970 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांची गाणी आणि कविता जगभरातील लोकांच्या ओठावर आहेत.

उत्तर प्रदेशात झाला जन्म 

उत्तर प्रदेशातील बदायुन शहरात 3 ऑगस्ट 1916 रोजी जन्मलेले शकील अहमद उर्फ ​​शकील बदायुनी यांनी 1942 मध्ये बी.ए पदवी मिळवल्यानंतर दिल्ली गाठली आणि तेथे त्यांनी पुरवठा विभागात पुरवठा अधिकारी म्हणून पहिली नोकरी स्वीकारली. या दरम्यान ते मुशायऱ्यात सहभागी होत राहिले, ज्यामुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कवितेच्या अखंड यशाने प्रोत्साहित होऊन शकील बदायुनी यांनी नोकरी सोडली आणि 1946 मध्ये दिल्लीहून मुंबईत आले.

मुंबईत येताच त्यांची भेट त्याकाळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते ए आर कारदार आणि महान संगीतकार नौशाद यांच्याशी झाली. नौशादच्या सांगण्यावरून शकील यांनी 'हम दिल का अफसाना दुनिया को सुना देंगे, हर दिल में मोहब्बत की आग लगा देंगे' हे गीत लिहिले. शकील बदायुनी यांनी 1947 मध्ये आलेल्या 'दर्द' चित्रपटातील 'अफसाना लिख रही हूं' ही गीत लिहिले. हे गीत इतके गाजले की त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

नौशाद आणि हेमंत यांच्यासोबत हिट राहिली जोडी

प्रसिद्ध संगीतकार नौशाद आणि हेमंत कुमार यांच्यासोबत शकील बदायुनी यांची जोडी खूप चांगली जमली. शकील बदायुनी यांनी हेमंत कुमार यांच्या संगीतावर 'बेकरार कर के हमें यूं न जाइये'.., कहीं दीप जले कहीं दिल.. जरा नजरों से कह दो जी निशाना चूक ना जाए.. (बीस साल बाद, 1962) आणि भंवरा बडा नादान है बगियन का मेहमान है.., ना जाओ सइयां छुडा के बहियां.. (साहब बीबी और गुलाम, 1962), जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आए.. (जिंदगी और मौत, 1963) सारखे प्रसिद्ध गीत लिहिले. 

तीनदा मिळवला फिल्मफेअर पुरस्कार 

शकील बदायुनी यांना त्यांच्या गाण्यांसाठी सलग तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या चौधवी का चांद या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घराना' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला. याशिवाय 1962 मध्ये 'बीस साल बाद' चित्रपटातील 'कहीं दीप जले कहीं दिल...' या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शकील बदायुनी यांनी लिहिलेले काही प्रसिद्ध गीत 

अफसाना लिख रही हूं (दर्द)

चौदहवीं का चांद हो या आफताब हो (चौदहवीं का चांद)

जरा नजरों से कह दो जी निशाना चूक न जाये (बीस साल बाद)

नन्हा मुन्ना राही हूं देश का सिपाही हूं (सन ऑफ इंडिया)

सुहानी रात ढल चुकी (दुलारी)

दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा (मदर इंडिया)

प्यार किया तो डरना क्या (मुगले आजम)

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
बोगद्यात भूस्खलन, 20 कामगारांचे मृतदेह सापडले, 5 जण अजूनही अडकले; बोगदा मिथेन वायूने ​​भरल्याने बचाव पथके सुद्धा बेशुद्ध पडली
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी चर्चा
Ajit Pawar and Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Embed widget