![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
Aai Kuthe Kay Karte : देशमुखांच्या घरातील दोन महत्त्वाची माणसं घर सोडून गेल्याने कुटुंबात देखील नवा वाद निर्माण झाला आहे.
![Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! Aai Kuthe Kay Karte latest update Anirudha asked kanchan to bring back appa at home Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/4d97ddb2cd3ef4e982b4ff2046613972_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe Kay Karte : मालिकाविश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत अग्रक्रमावर आहे. या मालिकेत दररोज येणारी नवी वळणं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. ‘अरुंधती’पासून ते ‘आशुतोष’पर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या या मालिकेत कुटुंब आणि नात्यांमधील ओढाताण असा ट्रॅक सुरु आहे. एकीकडे, अरुंधती देशमुखांचं घर सोडून वेगळी राहतेय, तर दुसरीकडे अप्पा देखील घर सोडून गेले आहेत.
देशमुखांच्या घरातील दोन महत्त्वाची माणसं घर सोडून गेल्याने कुटुंबात देखील नवा वाद निर्माण झाला आहे. अरुंधतीची बाजू घेणाऱ्या अप्पांना कांचनने खूप काही सुनावल्यानंतर त्यांनी देखील घर शोधण्याचा निर्णय घेतला होता.
अप्पा घर सोडून गेल्याचे अनिरुद्धला कळणार!
अनिरुद्ध कामाच्या निमित्ताने बाहेर गेला असता, हा सगळा प्रकार आणि वादविवाद घडला आहे. त्याच्या अनुपस्थिती अप्पांनी देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपण रागाच्याभरात जरा जास्तच बोलून गेलो याची जाणीव झाल्याने आता कांचनला देखील पश्चात्ताप होतो आहे. आपली चूक कळल्यानंतर अप्पांनी पुन्हा घरी यावे यासाठी त्या प्रयत्न देखील करतात. मात्र, अप्पा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे अनिरुद्ध देखील घरी आला आहे आणि त्याला अप्पा घरात नसल्याचे कळले आहे.
अप्पांना घेऊन ये, नाहीतर...
कामावरून परत आलेल्या अनिरुद्धला एव्हाना अप्पा, आई आणि संजना घरात नसल्याचं लक्षात आलं आहे. यावरून तो घरात काय घडलं याची माहिती घेणार आहे. आता घरातील इतर मंडळींकडून अनिरुद्धला घडला प्रकार कळला आहे. त्यामुळे तो पुन्हा संतापला आहे. त्याचवेळी आईला एकटीच येताना पाहून त्याचा रागाचा पारा आणखीनच वाढला आहे. अप्पा का आले नाही सोबत, असं विचारत असतानाच, आई एकटी आली म्हणून तिला देखील घराबाहेर जा असं अनिरुद्ध सांगणार आहे. ‘यायचं तर अप्पांना सोबत घेऊन ये, नाहीतर तू पण येऊ नकोस..’, असं अनिरुद्ध आईला अर्थात कांचनला सांगणार आहे.
हेही वाचा :
- Yashoda : समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर, सिनेमात अॅक्शनचा तडका
- Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)