एक्स्प्लोर

EVM-VVPAT पडताळणी : 21 विरोधी पक्षांना सुप्रीम कोर्टाचा झटका, फेरविचार याचिका फेटाळली

टीडीपी आणि काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीसाठी चंद्राबाबू नायडू, डी. राजा, संजय सिंह आणि फारुख अब्दुल्ला सुप्रीम कोर्टात उपस्थित होते. विरोधी पक्षांकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू लढत होते.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मतांचं व्हीव्हीपॅटसोबत पडताळणीची मागणी करणाऱ्या 21 विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने झटका देत त्यांची याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने आज (7 मे) विरोधी पक्षांची फेरविचार याचिका फेटाळली, ज्यात 50 टक्के मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा, मागणी केली होती. मागील आदेशात सुधारणा करण्याची आवश्यकता वाटत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. टीडीपी आणि काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीसाठी चंद्राबाबू नायडू, डी. राजा, संजय सिंह आणि फारुख अब्दुल्ला सुप्रीम कोर्टात उपस्थित होते. विरोधी पक्षांकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू लढत होते. "आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे, आमची याचिका ईव्हीएमबाबत नाही, तर व्हीव्हीपॅटबाबत होती," असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. यापूर्वी नियम होता की, मतमोजणीदरम्यान कोणत्याही विधानसभेच्या कोणत्याही मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी केली जाईल. या नियमात बदलाची मागणी करण्यासंदर्भात 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. VIDEO | सुप्रीम कोर्टाकडून 21 विरोधी पक्षांना झटका, फेरविचार याचिका फेटाळली | एबीपी माझा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 8 एप्रिल रोजी आपल्या निकालात म्हटलं होतं की, याचिकेतील मागणीमुळे सध्याची पडताळणी प्रक्रिया 125 टक्के वाढले. हे पूर्णत: अव्यवहारिक ठरेल. पण तरीही निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक विश्वसनीय बनवण्याचा प्रयत्न करायला हवा, विरोधी पक्षांच्या या युक्तीवादाशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून पाच ईव्हीएम मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करावी, असा आदेश देत आहोत. विरोधी पक्षांची मागणी काय? 8 एप्रिलच्या या निकालानंतर विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. काँग्रेस, सपा, बसपा, राजद, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम आणि टीडीपीसह एकूण 21 पक्षांची मागणी होती की, निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील किमान 50 टक्के ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करावी. परंतु निवडणूक आयोगही या मागणीच्या विरोधात आहे. ही मागणी मान्य केल्यास निकालाला विलंब होईल, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. याचिका फेटाळली या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी फेरविचार याचिका दाखल केली. परंतु एकच प्रकरण वारंवार ऐकलं जाऊ शकत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितलं. त्यावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत. मात्र एका विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी म्हणजे उंटाच्या तोंडा जिरं. जर 50 टक्के पडताळणी होऊ शकली नाही तर किमान 25 टक्के पडताळणीची सुविधा करावी. आमची याचिका ईव्हीएमबाबत नाही, तर व्हीव्हीपॅटबाबत होती.

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget