एक्स्प्लोर

नालासोपारा विधानसभा | एन्काऊंटर स्पेशालिस्ट भेदू शकतील का ठाकूरांचा बालेकिल्ला?

वाघाच्या जबड्यातून एखादी शिकार पळवण्यासारखं हे काम प्रदिप शर्माकडे असणार आहे. नालासोपारा विधानसभेत एण्ट्री घेण्याअगोदरच शर्मांचे हितचिंतक कामाला लागले आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आयत्या वेळेला कोणता निर्णय घेवून राजकीय खळबळ माजवतील याचा नेम नाही.

नालासोपारा  : यंदाची नालासोपारा विधानसभा निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. कारण ही तसचं आहे.  1990 च्या दशकापासून वसई, विरार आणि नालासोपारा शहरावर हितेंद्र ठाकूरांचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळेच 2009 साली वसई विधानसभेचे अडीच भाग झाल्यानंतर ही तीनही विधानसभा हितेंद्र ठाकूरांकडे राहिल्या आहेत. 2009 ची वसई विधानसभेचा अपवाद वगळता सत्ता ठाकूरांच्या हातीच राहिली आहे. 2009 ला महापालिकेतून गावे वगळण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार विवेक पंडित निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भलेभले गारद झाल्यानंतर बहुजन विकास विकास आघाडीही गारद झाली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार चिंतामण वणगा यांना 1,04, 723 मतं मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव 71,199 मतं मिळाली होती. 33,524 मतांच्या फरकाने बहुजन विकास आघाडीला हरवत मोदी लाटेत चिंतामण वणगा खासदार झाले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र आमदार हितेंद्र ठाकूरांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केलं. जिथे मनसेसारखा पक्ष महाराष्ट्रात हतबल झाला तिथे हितेंद्र ठाकूरांनी आपला वसई विधानसभा पुन्हा ताब्यात घेतली. शिवाय नालासोपारा आणि बोईसर विधानसभाही जिंकल्या. त्यावेळी नालासोपारा विधानसभेतून ठाकूरांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे 59,067 मतांनी भाजपाच्या राजन नाईक आणि शिवसेनेच्या शिरीष चव्हाणांना नमवून जिंकले. त्यावेळी युती न झाल्याने सेना भाजपा वेगवेगळे लढले होते.  या दोघांची ही मतं एकत्र केली तरी 14,178 अधिक मतं क्षितीज ठाकूरांना होती. 2014 विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतं क्षितीज ठाकूर - बहुजन विकास आघाडी – 1,13,566, राजन नाईक – भाजपा – 59,067 शिरीष चव्हाण – शिवसेना – 40,321 असा इतिहास असताना लोकसभेची तुलना विधानसभेत करण जिकरीच ठरेल. 2009 साली पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीने लोकसभेत एन्ट्री करुन लोकसभा जिंकलीही  होती. मात्र त्यानंतर मोदी लाटेत भाजपाचे चिंतामण वणगा यांनी 1,04,723 मतं घेतली तर बहुजन विकास आघाडीला 71,199 मतं मिळाली. त्यानंतर चिंतामण वणगाच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सेना आणि भाजपा वेगवेगळे लढून ही बहुजन विकास आघाडीला पालघर लोकसभा जिंकता आली नाही. तर 2019 च्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत तर सेना भाजपाची युती होती. त्यावेळी नालासोपाऱ्यातून सेनेला 1,33,259  तर बहुजन विकास आघाडीला 1, 07, 724 मतं मिळाली होती. नालासोपाराच्या बालेकिल्ल्यातून बहुजन विकास आघाडी 25,535 मतांनी पिछाडीवर राहिली. त्याचमुळे शिवसेना आणि भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदणार असा आत्मविश्वास सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना ठाकूरांच्या समोर उतरवलं असल्याने मोठी फाईट नालासोपारा विधानसभेत बघायला मिळेल.  असं असलं तरी 2014 च्या लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभेचा इतिहास विसरता येणार नाही. नालासोपारा विधानसभेत अनेक समस्या आहेत. तो सोडवणारा नेता आता नालासोपारावासियांना हवा आहे. नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामाच साम्राज्य उभं राहिलं आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी, इमारती उभ्या राहिल्या आहेत. तिथे प्रामुख्याने पाण्याची समस्या आहे. मागच्या वर्षी आणि यंदाही पावसाच्या सरीत वसई विरारचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. रस्त्यावर, तळघरात, दुकानात पाणी साचून नागरिकांचं लाखोचं नुकसान झालं आहे.  नवीन इमारतीना अजून नळ कनेक्शन मिळालं नाही. चाळींना पाण्याचं कनेक्शन मिळालेलं नाही. क्षेत्रात पाण्याची भीषण टंचाई आजही जाणवत आहे. टॅंकर माफिया आजही येथे सक्रिय आहेत. एक रुम दोन ते तीन जणांना विकणारा चाळ माफीयाही येथे सक्रिय आहे. कितीतरी नागरिकांना चिटर बिल्डरांनी फसवलं आहे. नालासोपारा उड्डाणपुलाजवळ तसेच शहरात इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफीकची समस्या आहे. विरार, नालासोपारा, विरार येथे अजून एक रेल्वेहून जाणारा पूर्व पश्चिम उड्डाणपूल बनवणं गरजेचं आहे. आरोग्याची सेवा देखील तोकडी आहे.  फेरीवाल्यांनी येथे उच्छाद मांडला आहे. फेरीवाला धोरण अजून राबवण्यात आलं नाही. महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात ही जनसामान्यात आक्रोश आहे. अशा अनेक समस्यांनी नालासोपारा विधानसभा क्षेत्र ग्रासलेलं आहे. सर्व समाजातील लोकांचा वर्ग येथे पाहायला मिळतो. तसं असलं तरी उत्तर भारतीयांची मतं मात्र निर्णायक ठरतात हे नक्की. येथे लाखाच्यावर उत्तर भारतीय आहेत.  त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उत्तर प्रदेशच्या दिग्गज नेत्यांच्या सभा नालासोपाऱ्यात निवडणुकीच्या दरम्यान होतात. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा  नालासोपाऱ्यात लावल्या जातात.  त्याचा इफेक्ट ही मतदानात होताना दिसून येतो.  त्यासाठी उत्तर भारतीयांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी शिवसेनेनं प्रदिप शर्मांसारखा एक  चेहरा शोधला आहे. त्यामुळे सध्या नालासोपारा निवडणूक ही मोठी अटीतटीची आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. हितेंद्र ठाकूरांच्या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना-भाजप याठिकाणी ताकत पणाला लावणार हे नक्की. साम, दाम, दंड, भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत हा गड जिंकायचा असा कयास त्यांनी बांधला आहे. नालासोपारा विधानसभेतून शिवसेनेकडून उतरविण्यासाठी प्रदिप शर्मांची राजकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.  प्रदिप शर्मा यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. पण तो अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे प्रदिप शर्मा अजूनपर्यंत उघडपणे कोणतीच राजकीय भूमिका घेताना दिसत नाहीत.  मात्र प्रदिप शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे. मात्र वाघाच्या जबड्यातून एखादी शिकार पळवण्यासारखं हे काम प्रदिप शर्माकडे असणार आहे. नालासोपारा विधानसभेत एण्ट्री घेण्याअगोदरच शर्मांचे हितचिंतक कामाला लागले आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आयत्या वेळेला कोणता निर्णय घेवून राजकीय खळबळ माजवतील याचा नेम नाही. जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget