एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024: देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या भेटीची आवई उठली, ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा. ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच संजय राऊत यांनीही अमित शाह यांची भेट घेतल्याचे काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगितले जात होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या सगळ्यावर आता ठाकरे गटातील (Thackeray Camp) एका उच्चपदस्थ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. या नेत्याने 'एबीपी माझा'शी बोलताना याबाबतची माहिती दिली.

शिवसेनेतील या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद जरुर आहे. पण ठाकरे गट विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याचा कोणताही विचार करत नाही. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने काँग्रेस पक्षासाठी रामटेक आणि अमरावतीची जागा सोडली होती. रामटेकची सहा टर्म निवडून येणारी जागा ठाकरे गटाने मन मोठं करुन काँग्रेसला दिली होती. त्यावेळी ठाकरे गटाने मित्रपक्षांचा विचार केला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला पक्षवाढीसाठी विदर्भात काही जागा काँग्रेसने सोडाव्यात, असे ठाकरे गटाचे म्हणणे असल्याची माहिती संबंधित नेत्याने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.

किमान तीन जागा द्या, ठाकरे गटाची मागणी

ठाकरे गटातील उच्चपदस्थ नेत्याच्या माहितीनुसार, विदर्भात आम्हाला पक्षवाढीसाठी काही संधी मिळावी, असे आमचे म्हणणे आहे. आम्ही लोकसभेला विदर्भात काँग्रेससाठी दोन जागा सोडल्या होत्या. त्या मोबदल्यात आता विधानसभेला विदर्भातील किमान तीन मतदारसंघ काँग्रेसने सोडावेत, अशी आमची मागणी आहे. त्याबद्दल आमची काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. मात्र, नाना पटोले विदर्भातील या तीन जागा सोडायला तयार नाहीत. आम्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीवेळी सिटींग खासदाराची सीट दिली. त्यामुळे आता आम्हाला तीन जागा द्याव्यात. या सगळ्यावर आज किंवा उद्यापर्यंत तोडगा निघेल. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. आम्हाला जागावाटपात विदर्भात सन्मानजनक जागा मिळाव्यात, इतकी आमची अपेक्षा असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्याने सांगितले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेला आम्ही ठाकरे गटाला जास्त जागा दिल्या, आता त्यांनी विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा द्याव्यात, असा युक्तिवाद काँग्रेसच्या गोटातून केला जात आहे.

नेमकी काय चर्चा?

सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात फिरत असलेल्या बातमीनुसार, उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या आक्रमक बाण्याने काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. भाजप ठाकरेंबाबत 'बिहार पॅटर्न' राबवण्याची भीती काँग्रेसला सतावत असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. मात्र,काँग्रेसच्या नेत्यांनी या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आणखी वाचा

ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget