एक्स्प्लोर

साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे; शरद पवारांचा एल्गार अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Sharad Pawar: आपल्याला जे जे सोडून गेले आहेत, त्यांना साधंसुधं पाडायचा नाहीतर जोरात पाडायचं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

Sharad Pawar: आपल्याला जे जे सोडून गेले आहेत यांचे आता काय करायचे असा सवाल शरद पवारांनी (Sharad Pawar) आज सभेतील गर्दीला केला. यावेळी जोरदार पाडायचे असे उत्तर गर्दीतून आले. माढा विधानसभा मतदारसंघाचे (Madha Assembly Constituency) शरद पवार गटाचे उमेदावर अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजीत केलेल्या टेंभिुर्णीतील सभेत ते बोलत होते. सोडून गेलेल्यांना असं तसं पाडायचं नाही तर महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. लोळत पाडा. कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही असा टोला देखील शरद पवार यांनी नाव न घेता आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांना लगावला. 

यावेळी बोलताना शरद पवार यांनी 1980 च्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा देखील सांगितला. 1980  साली माझे असेच 58 आमदार निवडून आले होते. मी तेव्हा परदेशात गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर 58 पैकी 52 आमदार मला सोडून गेले होते. मग तीन वर्ष मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व नवीन नवीन दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या 52 पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही असेही शरद पवार म्हणाले. मग आता हे जे सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे? असा जनतेला सवाल करत शरद पवार गेलेले सगळे पाडायचे म्हणाले. 

सोडून गेलेल्यांना त्यांची जागा त्यांना दाखवलीच पाहिजे

आम्हाला 40 वर्ष साथ दिली म्हणतात पण ते आता सोडून गेले आहेत. त्याचं काय करायचं? असा सवाल पवारांनी सभेत केला. यावेळी त्यांना पाडायचे असे जनतेतून उत्तर आहे. यावेळी पवार म्हणाले की त्यांची जागा त्यांना दाखवलीच पाहिजे. जागा दाखवायची असेल तर साधसुध पाडायचं नाही. लोळत पाडायचं संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे असे शरद पवार म्हणाले. 

मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले

हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही शरद पवार म्हणाले. मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले. 2 वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही असेही पवार म्हणाले.  तसेच 62 लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. 

महत्लाच्या बातम्या:

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget