एक्स्प्लोर

लातूरमध्ये काँग्रेसची विधानसभेच्या वन-डेपूर्वी लोकसभेची कसोटी

लातूर लोकसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र 2009 पासून उतरती कळा लागली. 2014 साली सुनील गायकवाड यांनी अडीच लाख मते घेत भाजपाची मजबूत पकड तयार केली. आज जिल्ह्यात सर्वत्र भाजपाचा बोलबाला आहे. नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद,आणि महानगरपालिका काँग्रेसकडून खेचून आणण्यात भाजपाला यश आले.

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र 2009 पासून उतरती कळा लागली. 2014 साली सुनील गायकवाड यांनी अडीच लाख मते घेत भाजपाची मजबूत पकड तयार केली. आज जिल्ह्यात सर्वत्र भाजपाचा बोलबाला आहे. नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद,आणि महानगरपालिका काँग्रेसकडून खेचून आणण्यात भाजपाला यश आले. विधानसभेपूर्वी जोर आजमाईश रंगणार आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या टीममधील खेळाडूचे बलाबल पाहुयात. लातूर काँग्रेसचे कर्णधार आहेत अमित विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा ते चालवत आहेत. मात्र विलासराव यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षात त्याचे शत्रूच जास्त निर्माण झाले आहेत. याचा फटका त्यांना वेळोवेळी बसत आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दिलीपराव देशमुख यांच्या सारखी मोठी नावे बरोबर आहेत. मात्र हे सर्वजण मिळूनही जिल्ह्यावर पकड निर्माण करू शकत नाहीत. यांची नावे मोठी आहेत मात्र आजमितीच्या राजकारणात हे सर्व सल्लगार मंडळात दाखल झाले आहेत. आजघडीला काँग्रेसचा जिल्ह्याभरात एकच चेहेरा आहे तो स्व:ता अमित देशमुख यांचा. नाही म्हणायला औसाचे आमदार बसवराज पाटील मुरूमकर काँग्रेसमध्ये आहेत मात्र त्याचे लक्ष उस्मानाबादेत जास्त रमते. गटा तटाचा वाद नको यामुळे ते लातूर जिल्ह्यातील राजकारणात अंग चोरून राहतात. मारोती महाराज साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भाजपा काँग्रेसमधील वादात तटस्थ भूमिका घेतली होती. त्यांचे वेट अॅण्ड वॉच धोरण काँग्रेससाठी घातक ठरत आहे. त्याला देशमुखांच्या एकहाती सत्ता असतानाच्या वागणुकीची ही किनार आहे. लातूर ग्रामीण मधील आमदार त्र्यंबक भिसे यांनाच देशमुखांवर अवलंबून राहावे लागत असल्याने तेथून मदत मिळणे अवघड आहे. 2014 साली काँग्रेसच्या हातून लोकसभा गेली आणि परभवाची मालिका सुरु झाली. हातून नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद आणि लातूर महानगरपालिका गेली. भाजपातील तरुणांच्या राजकीय डावपेचाला मोदी लाटेचे अस्तर मिळाले आणि आमदार संभाजी पाटील झिरो ते हिरो ठरले. त्यावेळी काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने मैदानात उतरण्याची तयारी दाखवली नाही. नावापुरते काही सभांना हजेरी लावली होती त्याच वेळी दिशा आणि दशा स्पष्ट झाली होती. या महायुद्धात शरपंजरी पडलेले जेष्ठ आणि तरुणाची नसलेली साथ, भाजपात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबविण्यात आलेले अपयश त्यांचे बंधू धीरज यांच्यासाठी लातूर ग्रामीणमध्ये सुरु असलेल्या मशागत यातून बाहेर येण्यासाठीच अमित देशमुखांची बरीच ताकद खर्ची पडत आहे. लोकसभेसाठी तयारी सुरु केली त्यांच्या मताने उमेदवार फायनल होत नव्हता. त्यातच ज्येष्ठांचे सल्लगार मंडळ नको ते प्रश्न निर्माण करत होते आणि पक्षांतर्गत अशोक चव्हाणांची मर्जी सांभाळताना अमित देशमुखाची तारेवरची कसरत होत होती. अशोक चव्हाणांच्या गटातील राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले मछिंद्र कामंत यांची वर्णी लागली आहे. आता हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अमित देशमुखांच्या खांद्यावर आली आहे. लोकसभेच्या जय-पराजयावरच अमित देशमुखांचे विधानसभेतील गणिते अवलंबून आहेत. या विजयातूनच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून बंधू धीरज देशमुखांसाठी सुरु असलेली तयारी आणि स्वतासाठी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र नित्यनेमाने काँग्रेसची होणारी वाताहात, रस्त्यावर उतरून संघर्ष न करण्याची वृत्ती आणि पराभूत मानसिकता यातून बाहेर येण्यासाठी विधानसभेपूर्वी एका विजयाची त्यांना गरज आहे. विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या महानगरपालिका निवडणूक प्रचारात एक वाक्य बोलले होते त्याचा वापर काँग्रेस आजही करत आहे. 'आता ही सर्व जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय'. हेच वाक्य काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने अमित देशमुखसाठी वापरलं आहे. यात ते किती यशस्वी होतील ते 23 मे नंतर समोर येईलच.

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget