एक्स्प्लोर

Punjab Elections : केजरीवालांचे लक्ष्य 'पंजाब', आजपासून आठवडाभर पंजाबमध्ये ठोकणार तळ

पंजाब निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी जोरदार तयारीत मैदानात उतरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आजपासून आठवडाभर पंजाबच्या दौऱ्यावर आहेत.

Punjab Assembly Elections 2022 : पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दुसरीकडे पंजाबध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही मिटायला तयार नाही. कारण, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून काँग्रेसने चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव पुढे केल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू नाराज असल्याचे दिसत आहे. अशातच आता आम आदमी पार्टी मात्र, पंजाबमध्ये जोरदार तयारी करुन मैदानात उतरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आजपासून आठवडाभर पंजाबमध्ये तळ ठोकणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमोर पंजाबमध्ये सत्ता वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

युद्ध जिंकण्यासाठी सैन्याच्या ताकदीपेक्षा त्यांचे धैर्य आणि एकता महत्त्वाची असते. सिद्धू आणि चन्नी यांच्यातील वाद अजूनही सुरूच असेल, तर काँग्रेसला सावध राहण्याची गरज आहे. कारण अरविंद केजरीवाल पूर्ण तयारीनिशी पंजाबच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. गोव्यातील प्रचार संपवून केजरीवाल आज पंजाबमध्ये पोहोचणार आहेत. आठवडाभर ते पंजाबमध्ये तळ ठोकणार आहेत. अरविंद केजरीवाल हे अमृतसर, जालंधर, मोहालीसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी फिरणार आहेत. केजरीवाल यांची नजर आपले ध्येय पूर्ण करण्याकडे लागली आहे. त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारही मेहनत घेत आहेत. तेही सिद्धूंच्याच भागात. भगवंत मान हे आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. भगवंत मान  यांनी अमृतसर जिल्ह्यातील त्यांच्या चार उमेदवारांच्या समर्थनार्थ रोड शो केला आहे. मान यांनी पंजाबच्या जनतेला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्याच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

केजरीवालांचे लक्ष्य पंजाबवर 

आता अरविंद केजरीवाल यांचे संपूर्ण लक्ष पंजाबवर आहे. काल केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनीही दिल्लीहून पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर भगवंत मान यांचा प्रचार केला होता. सुनीता केजरीवाल या त्यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत भगवंत मान यांच्यासाठी धुरी येथे प्रचार केला. आम आदमी पार्टीला या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सध्या देशात सुरू आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील राजयकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 10 फेब्रुलारीला पार पडला होता. त्यानंतर आता पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया 14  फेब्रुलारीला पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तसेच उत्तराखंड आणि गोव्यामध्ये देखील आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. कारण तिथेही 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Assam Elections Results 2026 : आसाममध्ये पुन्हा 'कमळ' फुलणार की काँग्रेस कमबॅक करत हिमंत बिस्वा सरमांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापासून रोखणार? वाचा A to Z माहिती
आसाममध्ये पुन्हा 'कमळ' फुलणार की काँग्रेस कमबॅक करत हिमंत बिस्वा सरमांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापासून रोखणार? वाचा A to Z माहिती
Assembly Elections 2026: दक्षिणेचा फैसला उद्या, तामिळनाडूत स्टॅलिन-विजयची फाईट, केरळमध्ये 'हात' चालणार की 'डावे' टिकणार? पुदुच्चेरीचा कौल कोणाकडे?
दक्षिणेचा फैसला उद्या, तामिळनाडूत स्टॅलिन-विजयची फाईट, केरळमध्ये 'हात' चालणार की 'डावे' टिकणार? पुदुच्चेरीचा कौल कोणाकडे?
West Bengal Election 2026: सगळे एक्झिट पोल भाजपच्या बाजूने, पण शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जींचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज, 'आपण 200 जागा जिंकतोय, शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका'
सगळे एक्झिट पोल भाजपच्या बाजूने, पण शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जींचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज, 'आपण 200 जागा जिंकतोय, शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका'

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Embed widget