एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही, शरद पवारांचा घणाघात

ना खाउंगा ना खाने दुगा म्हणणाऱ्या मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्ससाठी 350 कोटींचे विमान 1660 कोटींना विकत घेण्याचं काम केलं. मोदींनी देशाच्या कंपनीऐवजी अंबानीच्या कंपनीला राफेलचं कंत्राट दिलं, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.

परभणी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकार आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींवर निशाण साधला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, नोटबंदी, जीएसटी, राफेल अशा विविध मुद्द्यांवर शरद पवारांनी मोदींना आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. मोदींच्या हाती देश सुरक्षित नाही अशी टीका पवारांंनी केली. परभणीतील प्रचार सभेत शरद पवार बोलत होते.

मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली नाहीत. युवकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं. मात्र देशातील बेरोजगार तरुणांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवायचा असेल तर युवकांनी लढा दिला पाहिजे, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं.

मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं

मोदी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावरही पवारांनी टीकास्त्र सोडलं. बळीराजाला संकटात टाकण्याचे काम सरकारने केले. आमच्या काळात शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू आम्ही पुसले होते. आम्ही शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. मिमिक्री करत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

VIDEO | महाआघाडीच्या सभेत शरद पवारांचा 56 इंचाच्या छातीवर निशाणा | कराड, सातारा | एबीपी माझा

शेतमालाला योग्य भाव देण्याचं आश्वासनही भाजप सरकारने दिलं होतं. मात्र ना शेतमालाचे भाव वाढवले ना कर्जमाफ केले. आज दुष्काळ गंभीर आहे तरीही पाणी नाही, चारा छावण्या नाहीत. शेतकऱ्यांना दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही सत्तेवर बसू देणार नाही. सरकारची हकालपट्टी आम्ही करु, असा निर्धार शरद पवारांनी यावेळी केला.

नोटबंदीनंतर 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या

नोटबंदी, जीएसटीने सामान्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. नोटबंदीनंतर परत आणलेला काळा पैसा तर कुठे जिरला हे मोदींनाच माहित आहे. नोटबंदीनंतर 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे कर्तृत्व भाजप सरकारचं आहे, अशी टीका करत सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या सरकारला खाली खेचा असं पवारांनी म्हटलं.

मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही

ना खाउंगा ना खाने दुगा म्हणणाऱ्या मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्ससाठी 350 कोटींचे विमान 1660 कोटींना विकत घेण्याचं काम केलं. मोदींनी देशाच्या कंपनीऐवजी अंबानीच्या कंपनीला राफेलचं कंत्राट दिलं. ज्यांनी कधी खेळण्यातलं विमान बनवलं नाही, त्यांना राफेलचं कंत्राट दिलं कसं, असा सवाल पवारांनी यावेळी विचारला. तसेच याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही. राफेलची चौकशी झाली तर सगळे जेलमध्ये जातील, म्हणून हे सर्व गुप्त ठेवलं जात आहे, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.

देशाच्या जवानांवर हल्ला केला गेला तेव्हा देश आपल्या सैनिकांच्या पाठीमागे उभा राहिला. कुणीही राजकारण केलं नाही, मात्र मोदींनीच याचं राजकारण केलं. अभिनंदन यांची सुटका जगाच्या दबावाने झाली. मात्र 56 इंच छाती वाल्यानी अभिनंदन यांना परत आणले, असं भाजपवाले सांगत आहेत. मड्यावरचं लोणी खायचं काम हे सरकार करतंय, असा आरोप पवारांनी केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
NEET Paper Leak Pune Crime : मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?
मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; पुरावे मिळू नये म्हणून मनिषा हवालदारने काय केलं?

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Embed widget