एक्स्प्लोर

Ashwani Kumar : हा सामूहिक चिंतेचा विषय; अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले काँग्रेसच्या जी-23 समुहातील नेते

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी पक्षांचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Ashwani Kumar Resigns From Congress : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. गोवा आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 2 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, येत्या 20 फेब्रुवारीला पंजाब विधानसभेसाठी (Punjab Election 2022) मतदान होत आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदे मंत्री अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी पक्षांचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे वरीष्ठ नेते  आणि काँग्रेसच्या ग्रुप -23 ग्रुप मधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर कँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दु:ख आणि नाराजी व्यक्त केली आहे. हा सामुहीक चिंतेचा विषय असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद  शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमचे महत्त्वाचे सहकारी अश्विनी कुमार यांनी काँग्रेस सोडल्याचे पाहून दुःख झाले. चार दशके पक्षाची सेवा करणारा माणूस निघून गेला हे दुर्दैव आहे. ही सामूहिक चिंतेची बाब असल्याचे अश्विनी कुमार यांनी म्हटले आहे.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांगी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी कुमार यांनी काँग्रेस सोडल्याची बातमी दुःखद आणि दुर्दैवी आहे. तो माझा जुना मित्र आहे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार मनीष तिवारी (Manish Tewari) यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.  अश्विनी कुमार यांच्या राजीनाम्याचे दुःख आहे. आमच्यामध्ये मतभेद होते, पण ते अतिशय सभ्य पद्धतीने होते. अश्विनी कुमार यांना हा निर्णय घेणे भाग पाडले हे दुर्दैवी असल्याचे तिवारी म्हणाले. आनंद शर्मा, मनीष तिवरी आणि हुड्ड हे जी-23 समुहातील नेते आहेत. ज्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांची मागणी केली होती. जी-23 हा काँग्रेसमदीव नाराज नेत्यांचा गट आहे.

अश्विनी कुमार 2002 मध्ये पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2004 आणि 2010 मध्येही अश्विनी कुमार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्विनीकुमार यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्विनी कुमार यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhanparishad Election : सोलापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल, भाजपची ताकद असतानाही शिंदे सेनेचा नेता निवडणूक लढवणार?
Vidhanparishad Election : सोलापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल, भाजपची ताकद असतानाही शिंदे सेनेचा नेता निवडणूक लढवणार?
कोकणातील जागा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेचा नकार, आमदार महेंद्र दळवींची कन्या निवडणुकीच्या रिंगणात
कोकणातील जागा राष्ट्रवादीला देण्यास शिवसेनेचा नकार, आमदार महेंद्र दळवींची कन्या निवडणुकीच्या रिंगणात
Sunil Tatkare : सुनील तटकरेंची पुत्रासाठी मोर्चेबांधणी, विधान परिषदेच्या जागावाटपाआधीच सुतारवाडीत महत्त्वाची बैठक
सुनील तटकरेंची पुत्रासाठी मोर्चेबांधणी, विधान परिषदेच्या जागावाटपाआधीच सुतारवाडीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी: शरद पवारांचा फोन आला अन्...; पुणे विधान परिषदेसाठी या नावावर शिक्कामोर्तब! आज भरणार उमेदवारी अर्ज
शरद पवारांचा फोन आला अन्...; पुणे विधान परिषदेसाठी या नावावर शिक्कामोर्तब! आज भरणार उमेदवारी अर्ज

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
Embed widget