एक्स्प्लोर

UGC: चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? वाचा काय म्हणतात डॉ.अनिल सहस्रबुद्धे

चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप मिळणं शक्य आहे का? या प्रश्नाची उत्तरे अनिल सहस्रबुद्धे यांनी सविस्तर दिली आहेत.  

मुंबई: आता चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप अनिवार्य असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नव्या रिसर्च इंटर्नशिप गाईडलाईन्सला मागील वर्षी मंजुरी मिळाली होती. यानंतर चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पुढच्या वर्षी सुरु करण्यासंदर्भात तयारी कुठपर्यंत झाली आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांची गरज नेमकी का आहे? चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप (Internship) मिळणं शक्य आहे का? असे काही प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. याच प्रश्नाची उत्तरे राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच आणि राष्ट्रीय मूल्यमापन मंडळचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्रबुद्धे (Dr Anil Sahasrabudhe) यांनी सविस्तर दिली आहेत.  

याचबद्दल बोलताना डॉ. अनिल सहस्रबुद्धे (Dr Anil Sahasrabudhe) म्हणाले की, ''तीन वर्षाची पदवी मिळाल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाहीत. त्यामुळे एक वर्ष आणखी या पदवीमध्ये असेल तर इंटर्नशिप ट्रेनिंग किंवा मग प्रॅक्टिकल अभ्यासक्रम शिकता येईल, त्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम तयार आहे. चार वर्षाचा जर अभ्यासक्रम हा पूर्ण केला तर विद्यार्थी एम्प्लॉयबल होऊ शकतो.''

चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप मिळणं शक्य आहे का?

याबद्दल बोलताना डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, ''चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातसुद्धा सर्वांना इंटर्नशिप मिळू शकते. जरी ती सर्वांना मिळू शकली नाही, तरी काही टक्के विद्यार्थ्यांना तर इंटर्नशिप मिळू शकते. सर्व राज्यांना आम्ही सूचना केल्या आहेत. यूजीसीनेसुद्धा सूचना केल्या आहेत. या चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करावा. मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळणं सहज शक्य आहे. कारण तिथे इंडस्ट्री आहे.'' ते म्हणाले की, आता दूर असलेल्या विद्यार्थ्यांना नेमकी इंटर्नशिप कशी मिळणार, त्यासाठी आम्ही एआयसीटीईने इंटर्नशिप पोर्टल तयार केला आहे. चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी विशेष इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही. तीन वर्षासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तेवढेच लागणार. शिक्षकांना सतत ट्रेनिंग यासंदर्भात सुरू आहे.''

मातृभाषेत अभियांत्रिकी आणि पदवीचे शिक्षण कसं मिळणार?

या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, ''मातृभाषा शिक्षण मिळावे यासाठी मी एआयसीटीईचा अध्यक्ष असतानाच तयारी सुरू केली होती. आम्ही बारा भारतीय भाषांमध्ये पुस्तकांचा अनुवाद केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची पुस्तके आम्ही तयार केली आहेत, ती प्रिंटेड फॉर्ममध्ये विकत घेण्याची गरज नाही. आम्ही वेबसाईटवर अपलोड केली आहेत. आम्ही सक्ती केली नाही की, मातृभाषा शिक्षण घ्या. मात्र जिथे विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकायचं आहे तिथे ते शिकू शकतील.''

देशात डिजिटल युनिव्हर्सिटी सुरुवात होण्याचं काम कुठपर्यंत आलंय?

याबद्दल माहिती देताना डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, मागच्या बजेटमध्ये डिजिटल युनिव्हर्सिटीबदल मांडण्यात आलं होतं. ते एक हब आणि स्पोक मॉडेल असेल. सेंट्रल युनिट असेल त्याच्या सोबत संलग्न विश्वविद्यालय आणि कॉलेज आणि स्टार्ट कंपनीत असतील. त्यांचे कोर्स विद्यार्थ्यांना घेता येतील आणि हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला डिग्री डिजिटल युनिव्हर्सिटी कडून मिळेल. ते म्हणाले, महाराष्ट्रात युनिव्हर्सिटी कधी सुरू माहित नाही. मात्र राष्ट्रीय पातळीवर एक डिजिटल विद्यापीठाचे काम सुरू आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget