एक्स्प्लोर

तंत्रज्ञान व पूर्वनियोजनाचे यश : नाशिक मुक्त विद्यापीठाच्या सर्व परिक्षा यशस्वी!

अनेक शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेताना अडचणी आल्या. मात्र, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळजवळ दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा (1 लाख 90 हजार 339) दिनांक 5 ऑक्टोबरपासून कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरु झाल्या.

मुंबई : कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण भारतामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेताना अडचणी आल्या. ठरलेल्या दिवशी परीक्षा अचानक रद्द तरी कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळजवळ दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा (1 लाख 90 हजार 339) दिनांक 5 ऑक्टोबरपासून कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरु झाल्या. आता त्या 30 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहेत.

सर्व्हर फेल होणे, पेपर वेळेवर न मिळणे, मुलांची कमी उपस्थिती असणे असे चित्र अनेकदा पुढे आलेले असताना मुक्त विद्यापीठाने यावर काय उपाय केला? हे शोधले असता रोचक माहिती पुढे आली आहे. सद्यस्थितीत पारंपरिक परीक्षा घेणे कठीण होणार हे ओळखून विद्यापीठाने आधीच नियोजन करून प्रत्येक विषयाची प्रश्नसंच तयार केली. विविध शिक्षणक्रमांसाठी 3 ते 4 पट प्रश्न तयार करून योग्य फॉरमॅटमध्ये बसविले. विद्यापीठ दूरस्थ पद्धतीने अनेक गोष्टी करत असल्याने यावेळी संपूर्ण परीक्षा ऑनलाईन घ्यावयाचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल डीस्टन्सीगचा प्रश्न आला नाही.

एकाच वेळी सर्व विद्याथी लॉग-इन झाले तर सर्व्हरवरील लोड वाढून तो फेल होतो. म्हणून पेपरची वेळ सरळ 5 तासांची ठेवली. म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते 8 अशा वेळेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही सलग एका तासात परीक्षा द्यावी असे स्वातंत्र्य दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीची वेळ घेता आली व सर्व्हरवरील लोडही विभागला गेला. शिवाय प्रश्नसंच पद्धतीमुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना (समान भाराचे) मात्र वेगवेगळे प्रश्न गेल्याने पेपरफुटीचाही प्रश्न आला नाही. मुक्त विद्यापीठाने वेळापत्रक बनविताना एका स्लॉटमध्ये सारखी विद्यार्थीसंख्या राहील याचीही काळजी घेतली.

SPPU Final year exams | पुणे विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांसमोर तांत्रिक अडचणींची परीक्षा

विद्यापीठाकडील अॅमॅझोनचा ‘क्लाउड सर्व्हर’ स्केलेबल असल्याने लोड जास्त झाल्यास तो नवीन सर्व्हरवर वितरीत होतो. विद्यार्थ्यांना अॅमॅझोन, गुगल, 3-सेव्हर्स आणि अॅझ्यूअर यापैकी कोणतीही व्यवस्था वापरण्याची मुभा आणि अँड्रोइड फोन, टॅबलेट, लपॅटॉप, कम्प्युटर, विंडो, अॅपल अशा सर्व सिस्टीमवर चालणारे ब्राउझर दिल्याने त्यांना अडचणी आल्या नाहीत. मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी महाराष्ट्रातील दुर्गम भागातही आहेत. घरात नेटवर्क मिळत नाही म्हणून काहीजण फोन घेऊन घराबाहेर गेले, कुणी गच्चीवर तर कुणी चक्क डोंगरावर जावूनही नेटवर्क मिळवले.

पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात 77% तर दुसऱ्या सत्रात 87% विद्यार्थी परीक्षेस बसले. आता या परीक्षा दिनांक 30 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहतील. पूर्वनियोजन आणि तंत्रज्ञानाचा आक्रमक वापर केल्यामुळे हे शक्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या परीक्षा 30 ऑक्टोबरपर्यंत सुरु आहेत.

डॉ. दिनेश भोंडे (विद्यापीठाचे कुलसचिव)

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत होतं. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झालेला होता. मुक्त विद्यापीठात शहरापासून खेड्यापर्यंत लाखो विद्यार्थी मुक्त विद्यापीठाद्वारे दूर शिक्षण घेत असतात. अशा विखुरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हे एक आव्हान आमच्या समोर होतं. मात्र. आम्ही तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आणि सुटसुटीत नियोजन करत या परीक्षा यशस्वीपणे घेण्यास सुरुवात केलेली आहे, आणि यामध्ये आम्हाला यशही प्राप्त झालेलं आहे.

डॉ. आंबेडकर विद्यापीठात परीक्षेचा गोंधळ सुरुच; 11वाजताच्या ऑफलाईन परीक्षेचे पेपर अद्याप मिळाले नाहीत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget