एक्स्प्लोर

'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' लिहिणारा पाकिस्तानी शायर

Allama Iqbal Death Anniversary: जेव्हा देशभक्तीचा विचार येतो तेव्हा आपल्या भारतीयांच्या मनात एक गीत नक्कीच येते, 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा'.. हे गीत त्या काळातील प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी 1905 मध्ये लिहिले होते.

Allama Iqbal Death Anniversary: जेव्हा देशभक्तीचा विचार येतो तेव्हा आपल्या भारतीयांच्या मनात एक गीत नक्कीच येते, ते म्हणजे 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा'.. हे गीत त्या काळातील प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांनी 1905 मध्ये लिहिले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा मध्यरात्री ठीक 12 वाजता संसद भवनाच्या कार्यक्रमात सर्वानी मिळून अनेक देशभक्तीच्या गीतांसह सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत देखील गायले होते.

9 नोव्हेंबर 1887 रोजी ब्रिटिश भारतातील सियालकोट येथे जन्मलेल्या इकबाल यांचे पूर्वज काश्मिरी ब्राह्मण होते. इक्बालचे पूर्वज सप्रु गोत्रातील काश्मिरी ब्राह्मण होते, ज्यांनी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. त्यांचे पूर्वज व्यवसायानिमित्त जम्मूहून पंजाबमधील सियालकोट येथे स्थायिक झाले होते. त्याचे वडील शेख नूर मोहम्मद हे सियालकोटमध्ये शिंपी म्हणून काम करायचे.

कवी मोहम्मद इकबाल यांना पाकिस्तानचे 'रुहानी फादर' म्हटले जाते. भारतीय उपखंडातील महान कवींपैकी एक मानले जाणारे इकबाल यांनी पर्शियन आणि उर्दूमध्ये सुमारे 12,000 शेर लिहिले. उर्दू शायरीत त्यांना मीर तकी मीर आणि मिर्झा गालिब यांच्या बरोबरीचे कवी मानले जाते.

इकबाल यांचे प्रारंभिक शिक्षण अरबी भाषेत झाले. पुढे त्यांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घेतले. इकबाल यांनी इंग्रजी आणि अरबी हे विषय घेऊन आपली बीएची पदवी मिळवली. इकबाल यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. इकबाल यांनी ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षणही घेतले आणि ते बॅरिस्टर झाले. पुढे ते संशोधनासाठी जर्मनीला गेले. इकबाल यांनी म्युनिक येथील लुडविग मॅक्सिमिलियन विद्यापीठातून Philosophy त पीएचडी केली. 

पुढे त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना अल्लामा ही पदवी मिळाली आणि ते अल्लामा इकबाल म्हणून ओळखले जाऊ लागले. इकबाल यांनी बॅरिस्टर आणि अरबी, इंग्रजी आणि Philosophy विषयांचे शिक्षक म्हणून काम केले. इकबाल आपल्या महाविद्यालयीन काळापासूनच  राजकीयदृष्ट्या जागरूक होते. 1906 मध्ये मुस्लीम लीगची स्थापना झाली तेव्हा इकबाल त्याच्याशी संबंधित होते. इकबाल हे भारतापासून वेगळ्या मुस्लिम देशाचे समर्थक होते. इकबालचे समीक्षक त्यांना भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला तात्विक आधार देणाऱ्या विचारवंतांपैकी एक मानतात. अल्लामा इकबाल यांचे 21 एप्रिल 1938 रोजी लाहोर येथे निधन झाले.

'लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी', 'शिकवा' आणि 'जवाबे-ए-शिकवा' या त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना आहेत. त्यांच्या अनेक रचना हिंदी भाषिक कवींनी हिंदीत भाषांतरित केल्या आहेत. त्यातील काही प्रसिद्ध गीत आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. इकबाल यांनी 21 एप्रिल 1938 रोजी जगाचा निरोप घेतला असला तरी लोकांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. कारण माणूस मरण पावला तरी त्याचे शब्द कधीच मरत नाहीत आणि कवी आपल्या कवितेत शतकानुशतके जिवंत राहतो.

इकबाल यांचे काही प्रसिद्ध शेर 

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा,
हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्ताँ हमारा।

खुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले,
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है।

मिटा दे अपनी हस्ती को गर कुछ मर्तबा चाहिए,
कि दाना खाक में मिलकर, गुले-गुलजार होता है।

सितारों से आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं,
तही ज़िंदगी से नहीं ये फ़ज़ाएँ
यहाँ सैकड़ों कारवाँ और भी हैं।

माना कि तेरी दीद के क़ाबिल नहीं हूँ मैं,
तू मेरा शौक़ देख मिरा इंतिज़ार देख।

नशा पिला के गिराना तो सब को आता है,
मज़ा तो तब है कि गिरतों को थाम ले साक़ी।

दिल से जो बात निकलती है असर रखती है,
पर नहीं ताक़त-ए-परवाज़ मगर रखती है।

जम्हूरियत इक तर्ज़-ए-हुकूमत है कि जिस में,
बंदों को गिना करते हैं तौला नहीं करते।

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget