एक्स्प्लोर

Maharashtra Exam: सरकारचा मोठा निर्णय! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक

Maharashtra School Exam: शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी आता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.

Maharashtra School Exam: आता, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. याआधी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होत असे. मात्र, पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते. 

राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्य सरकारने आज जारी केलेल्या आदेशानुसार, आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्याला देण्यात आला आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार,  पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

विद्यार्थी पाचवीची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला पाचवीच्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार  आहे. 

विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

वर्ष 2009 मध्ये लागू झालेल्या मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार, शाळांना आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, यामुळे आठवी पुढील शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात होता. त्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याची मागणी होऊ लागली होती.

2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाला तेव्हा 6 ते 14 वयोगटातील 80 लाख मुलं शालेय शिक्षणापासून वंचित होते.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
Dada Bhuse on TET Exam Paper Leak: परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाईड स्टोरी,म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना...'
परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाईड स्टोरी,म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना...'
Satyajeet Tambe on TET Exam Paper Leak: 'भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही'; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप
'भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही'; TET पेपरफुटीवर सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती
पेपर फुटल्याने परीक्षा रद्द, पुन्हा TET ची Exam कधी?; नोंदणीपासून परीक्षा केंद्र, फीपर्यंत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची A टू Z माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
Embed widget