एक्स्प्लोर

NCC Day : एनसीसीचा आज 73 वा स्थापना दिवस; जाणून घ्या काही रंजक गोष्टी

National Cadet Corps : देशातील विद्यार्थ्यांमध्ये लष्करी शिस्त रुजवणाऱ्या आणि लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या NCC चा आज स्थापना दिवस.

NCC Day :  महाविद्यालयीन तरुणांमध्ये लष्करी शिस्त आणि जबाबदार नागरीक घडवणाऱ्या नॅशनल कॅडेट कोर (NCC)आज आपला 73 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. एनसीसीच्या स्थापना दिवसानिमित्ताने विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोविड महासाथीच्या काळात काही ठिकाणी एनसीसीच्या कॅडेट्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांना शिस्त आणि जबाबदार नागरिकाची बीजे रोवणाऱ्या या एनसीसीबाबत जाणून घेऊयात काही गोष्टी..

एनसीसीची स्थापना कधी झाली? 

एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली. भारतीय संरक्षण कायदा-1917 नुसार लष्करातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने एनसीसीची स्थापना झाली. एनसीसीमध्ये 1949 पासून मुलींचा समावेश करण्यात येऊ लागला होता. 

नोव्हेंबरमध्ये एनसीसी दिवस का साजरा होतो?

एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या दर चौथ्या रविवारी एनसीसी दिवस साजरा करण्यात येतो. त्याचे कारणही खास आहे. सन 1947 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी दिल्लीत एनसीसीच्या पहिल्या युनिटची स्थापना झाली होती. 

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात एनसीसी कॅडेटची भूमिका 

वर्ष 1965 आणि 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले तेव्हा एनसीसी कॅडेट्सना शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये पाठवण्यात आले जेणेकरून ते आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांना शस्त्रे आणि दारूगोळा पाठविण्यात मदत करू शकतील. त्याशिवाय शत्रूंच्या पॅराट्रुपर्सना पकडण्यासाठीच्या गस्त पथकात त्यांचा समावेश करण्यात आला होता.  NCC कॅडेट्स नागरी संरक्षण अधिकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून बचाव कार्यात आणि वाहतूक नियंत्रणातही मदत करतात.

एनसीसीमध्ये प्रवेश घ्यायचा?

एनसीसीमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे. त्याशिवाय नेपाळच्या नागरिकांनाही एनसीसीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. एनसीसीत प्रवेश घेण्यासाठी किमान 12 वर्ष आणि अधिकाधिक 26 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. 

>> एनसीसी प्रमाणपत्र 

एनसीसीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रवेश घेता येऊ शकतो. त्यामुळेच त्यांचे चार विभाग आहेत. प्रत्येकी दोन-दोन विभाग मुले आणि मुलींसाठी आहे. मुलांच्या विभागाला कनिष्ठ विभाग (JD) आणि वरिष्ठ विभाग (SD) आणि मुलींच्या विभागाला ज्युनियर विंग (JW) आणि वरिष्ठ विभाग (SW) म्हणतात.

NCC A प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र कनिष्ठ विभागातील त्या कॅडेट्सना दिले जाते. ज्यांनी 2 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

NCC B प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांना दिले जाते. हे प्रमाणपत्र देखील दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच दिले जाते. 

NCC C प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र वरिष्ठ विभागातील 3 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
Vikram Kakade : 'जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो...', उमेदवारी अन् जय पवारांना कर्ज दिल्याच्या चर्चांवरती विक्रम काकडे स्पष्टपणे बोलले
'जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो...', उमेदवारी अन् जय पवारांना कर्ज दिल्याच्या चर्चांवरती विक्रम काकडे स्पष्टपणे बोलले
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं; मोदी स्वतः ठेवणार 21 जूनच्या परीक्षेवर लक्ष; पुढील वर्षापासून होणार मोठे बदल
नीट पेपरफुटीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं; मोदी स्वतः ठेवणार 21 जूनच्या परीक्षेवर लक्ष; पुढील वर्षापासून होणार मोठे बदल
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget