एक्स्प्लोर

Mahrashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर; बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या मुलीनेही निकालात मारली बाजी

Mahrashtra HSC Result: राज्यातील लाखो मुलांचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांच्या मुलीचाही आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.

Mahrashtra HSC Board: आज राज्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Board Result) जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व विभागीय मंडळाचे निकाल जाहीर केले. यावेळी इतर पालकांप्रमाणे खुद्द बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचं देखील टेन्शन वाढलं होतं. याचं कारण म्हणजे गोसावींच्या मुलीने देखील या वर्षी बारावीची परीक्षा दिली होती आणि तिच्या निकालाची देखील त्यांना प्रतिक्षा होती.

खरंतर बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल म्हटल्यावर विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनाही तेवढंच टेन्शन असतं. त्यात राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे सुद्धा इतर पालकांप्रमाणेच एक पालक आहेत. गोसावी यांची कन्या संस्कृती हिने यावर्षी बारावीची परीक्षा दिली, तिने विज्ञान शाखेत 77.50 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

बोर्डाच्या अध्यक्षांची मुलगी संस्कृती गोसावी हिने इंग्रजी विषयात 86 गुण, भूगोल विषयात 88 गुण, गणितामध्ये 69 गुण, भौतिकशास्त्र विषयात 55 गुण, रसायनशास्त्र विषयात 70, तर आयटी विषयात 97 असे एकूण 465 गुण मिळवले आहेत. संस्कृती ही पुण्यातील बाणेर येथील आदित्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. संस्कृतीला पुढे इंजिनिअरींगमध्ये करिअर करायचं असून तिला जेईई मेन्स या परीक्षमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. राज्याची सीईटी परीक्षा सुध्दा तिने दिली आहे.

बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी

  • पुणे : 93.34 टक्के 
  • नागपूर : 90.35 टक्के 
  • औरंगाबाद : 91.85 टक्के 
  • मुंबई : 88.13 टक्के  
  • कोल्हापूर : 93.28 टक्के 
  • अमरावती : 92.75 टक्के 
  • नाशिक : 91.66 टक्के 
  • लातूर : 90.37 टक्के 
  • कोकण : 96.25 टक्के 

राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा

मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के होता, यावेळी तो 91.25 टक्के आहे. म्हणजेच, मागीलवर्षी पेक्षा यावर्षीचा निकाल 2.97 टक्क्यांनी कमी आहे. यंदाच्या बारावीच्या बॅचने प्रथमच बोर्डाचा पेपर दिला होता, याआधी दहावीची परीक्षा कोरोनामुळे झाली नसल्याने त्यांच्यासाठी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव नवखाच होता आणि याचाच परिणाम निकालावर दिसून आला. दरवर्षीपेक्षा या वर्षीचा बारावीचा निकाल घसरला आहे. यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. याआधी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षेत अनेक बदल करण्यात आले होते.

कोरोनामुळे पहिल्या वर्षी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. तर गेल्या वर्षी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा घेताना कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती. परिणामी याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी - मार्चमध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल 0.59 ने अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के लागला होता.

 

हेही वाचा:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Pollution: मुंबईची हवा पुन्हा 'मध्यम' श्रेणीत, शहराचा AQI 106 वर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai's AQI: मुंबईची हवा पुन्हा 'अतिशय खराब', शिवडीचा निर्देशांक २५० पार, आरोग्याचा धोका वाढला
Delhi Pollution: 'सरकार अपयशी, आकडे लपवत आहे', इंडिया गेटवर नागरिक आक्रमक
Maharashtra Politics: 'विनाशकाले विपरीत बुद्धी', मित्रपक्षांच्या बेजबाबदार आरोपांवर Ajit Pawar यांची संयमी प्रतिक्रिया
Sharad Pawar On Yuti : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, शरद पवारांच्या सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Embed widget