एक्स्प्लोर

Mahrashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर; बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या मुलीनेही निकालात मारली बाजी

Mahrashtra HSC Result: राज्यातील लाखो मुलांचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांच्या मुलीचाही आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.

Mahrashtra HSC Board: आज राज्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Board Result) जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व विभागीय मंडळाचे निकाल जाहीर केले. यावेळी इतर पालकांप्रमाणे खुद्द बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचं देखील टेन्शन वाढलं होतं. याचं कारण म्हणजे गोसावींच्या मुलीने देखील या वर्षी बारावीची परीक्षा दिली होती आणि तिच्या निकालाची देखील त्यांना प्रतिक्षा होती.

खरंतर बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल म्हटल्यावर विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनाही तेवढंच टेन्शन असतं. त्यात राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे सुद्धा इतर पालकांप्रमाणेच एक पालक आहेत. गोसावी यांची कन्या संस्कृती हिने यावर्षी बारावीची परीक्षा दिली, तिने विज्ञान शाखेत 77.50 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

बोर्डाच्या अध्यक्षांची मुलगी संस्कृती गोसावी हिने इंग्रजी विषयात 86 गुण, भूगोल विषयात 88 गुण, गणितामध्ये 69 गुण, भौतिकशास्त्र विषयात 55 गुण, रसायनशास्त्र विषयात 70, तर आयटी विषयात 97 असे एकूण 465 गुण मिळवले आहेत. संस्कृती ही पुण्यातील बाणेर येथील आदित्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. संस्कृतीला पुढे इंजिनिअरींगमध्ये करिअर करायचं असून तिला जेईई मेन्स या परीक्षमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. राज्याची सीईटी परीक्षा सुध्दा तिने दिली आहे.

बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी

  • पुणे : 93.34 टक्के 
  • नागपूर : 90.35 टक्के 
  • औरंगाबाद : 91.85 टक्के 
  • मुंबई : 88.13 टक्के  
  • कोल्हापूर : 93.28 टक्के 
  • अमरावती : 92.75 टक्के 
  • नाशिक : 91.66 टक्के 
  • लातूर : 90.37 टक्के 
  • कोकण : 96.25 टक्के 

राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा

मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के होता, यावेळी तो 91.25 टक्के आहे. म्हणजेच, मागीलवर्षी पेक्षा यावर्षीचा निकाल 2.97 टक्क्यांनी कमी आहे. यंदाच्या बारावीच्या बॅचने प्रथमच बोर्डाचा पेपर दिला होता, याआधी दहावीची परीक्षा कोरोनामुळे झाली नसल्याने त्यांच्यासाठी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव नवखाच होता आणि याचाच परिणाम निकालावर दिसून आला. दरवर्षीपेक्षा या वर्षीचा बारावीचा निकाल घसरला आहे. यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. याआधी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षेत अनेक बदल करण्यात आले होते.

कोरोनामुळे पहिल्या वर्षी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. तर गेल्या वर्षी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा घेताना कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती. परिणामी याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी - मार्चमध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल 0.59 ने अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के लागला होता.

 

हेही वाचा:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Marathwada : कर्जमुक्ती नाही, तर सरकारला मत नाही, ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन
Maharashtra Politics: 'सत्ताधाऱ्यांना थांबवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं', Nashik मध्ये काँग्रेस नेते Shyamraj Khaire यांचे वक्तव्य
Alliance Politics: 'भाजप सोडून कुणासोबतही जा', स्थानिक निवडणुकींसाठी Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
Uddhav Thackeray Marathwada : 'माझा शेतकरी भोळाभाबडा, पण तो सरकारलाही फोडू शकतो'
EVM Row : 'तुम्ही मतचोरी म्हणून नोटचोरी केली', मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा Rahul Gandhi यांना टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Rahul Gandhi : ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
Rahul Gandhi: हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
Embed widget