एक्स्प्लोर

"शीना बोरा जिवंत आहे"; मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र

Sheena Bora Murder Case : देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Sheena Bora Murder Case : देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जीनं हा खुलासा केला आहे. इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला 9 पानी पत्र लिहिले असून यामध्ये शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटले आहे.  शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये आशा कोरके या महिला पोलीस अधिकाऱ्याने पाहिलंय, असा दावा  इंद्राणी मुखर्जीनं आपल्या पत्रात केला आहे. भायखळा कारागृहात कैद असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला नऊ पानी पत्र लिहिलं आहे. शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंतीही यामध्ये करण्यात आली आहे.  आशा कोरके यांनी दिलेली माहितीनंतर इंद्राणी मुखर्जीने CBI अधिकारी सुबोध जयसवाल यांना पत्र लिहिले आहे.  या पत्रात इंद्राणीने CBI समोर जबाब नोंदवण्यासही तयार असल्याचं सांगितलेय. कोर्टही पोलीस अधिकारी आशा कोरके यांचा जबाब नोंदवू शकते. 

पत्रात काय म्हटलेय इंद्राणी मुखर्जीनं ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह वसुली प्रकरणात CID द्वारा अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आशा कोरके यांनी शीना बोरा हिला काश्मीरमध्ये पाहिलं आहे. काश्मीरमध्ये फिरायला गेल्यानंतर शीना बोराला पाहिलं आहे. इंद्राणी मुखर्जीच्या पत्रानुसार, पोलीस अधिकारी आशा कोरके यांनी काश्मीरमध्ये शीना बोरा हिच्यासोबत संवाद साधला.  जून 2021च्या अखेरीस आणि जुलै 2021च्या सुरुवातीला आशा कोरके काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सुट्टयासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शीना बोरा आणि त्यांची भेट झाली. आशा कोरके यांनी शीना बोरा हिला सर्वांसमोर येऊन जिवंत असल्याचं सांगावं. हत्याच्या आरोपात तुरुंगात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला बाहेर काढावे असे आवाहनही केलं. यावर शीनाने आशा कोरके यांना आपण नवीन आयुष्य सुरु केलं आहे, पुन्हा आधीच्या आयुष्यात माघारी जायच नाही, असे सांगितलं. 

इंद्राणीने पत्रात सांगितले की, आशा कोरके श्रीनगरमध्ये डाल लेक येथे फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी तिथे त्यांनी डाल लेक जवळ एका महिलेला आपल्या मित्रांसोबत फिरायला आलेलं पाहिलं. त्या महिलेला पाहिल्यानंतर कुठेतरी पाहिल्याचा भास झाला झाला, वर्तमानपत्र अथवा टीव्हीवर पाहिल्याचं जाणवलं. त्यानंतर आशा कोरके त्या महिलेच्या जवळ गेल्यानंतर शीना बोरा असल्याचं समजलं. शीना असे नाव घेताच महिलेनं माघारी पाहिलं. त्यानंतर दोघांमध्ये थोडावेल संभाषण झालं. यामध्ये आशा कोरके यांनी शीनाला सर्वांसमोर येण्याचे आवाहन केलं.

काय आहे प्रकरण? - 
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
Radhakrishna Vikhe Patil on Ashok Kharat: 'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget