एक्स्प्लोर

Mumbai Crime : सीबीआयने सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पोबारा, सीजीएसटी अधीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

सीबीआय अधिकाऱ्यांनी सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पळून गेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime : सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांनी सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पळून गेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईतील (Mumbai) अँटॉप हिल पोलिसात सीजीएसटी अधीक्षक, एक सराफ आणि कर्मचारी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने पळून गेलेल्या तिघांचा शोध सुरु केला आहे.

लाच प्रकरणी आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपये दिले होते. सीजीएसटीचे अधीक्षक धीरेंद्र कुमार, अँटॉप हिल इथला ज्वेलर अमृतलाल शांखला आणि त्याचा कर्मचारी बबन हे पैसे घेऊन पळाले. एजन्सीकडून त्यांचा शोध सुरु आहे. अमृतलाल शांखला हा अँटॉप हिल परिसरात असलेल्या मुकेश ज्वेलर्सचा मालक असून बबन त्यांच्या दुकानात काम करतो.

अँटॉप हिल पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, धीरेंद्र कुमार हा चर्चगेट इथल्या सीजीएसटी आयुक्तालयाच्या कर चोरी विभागात अधीक्षक म्हणून तैनात होता. धीरेंद्र कुमारच्या वतीने लाचेची रक्कम गोळा करणारे ज्वेलर अमृतलाल शांखला आणि त्याचा कर्मचारी बबन सीबीआयने तक्रारदाराला दिलेली रक्कम घेऊन पसार झाले. एजन्सीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी पळ काढला आणि त्यांचा शोध सुरु आहे. 

अटक न करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी

या प्रकरणातील व्यापारी हा सोन्याची खरेदी-विक्री करतो आणि तो कांदिवली इथे राहतो. त्याच्या एका मित्र म्हणजेच या प्रकरणातील तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार नोंदवली होती. यामध्ये तक्रारदाराने दावा केला होता की, "मला व्यापाऱ्याचा व्हॉट्सअॅप कॉल आला होता. श्री बुलियन आणि इतर कंपन्यांशी संबंधित प्रकरणात आपण चर्चगेटमधील सीजीएसटी ऑफिसमधील सीजीएसटी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचं सांगितलं. करचुकवेगिरी प्रकरणात अटक न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली आहे." परंतु एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणं कठीण असल्याचं सांगितलं. त्यानंतर सीजीएसटी अधीक्षकाने लाचेची रक्कम एक कोटींवरुन 80 लाख रुपये केली. त्यानंतर ती आणखी कमी करत 50 लाख रुपयांवर आणली. ही रक्कम दोन हफ्त्यांमध्ये देण्याचं ठरलं. त्यानंतर लाचेचा पहिला हफ्ता 25 लाख रुपये 20 एप्रिल रोजी चर्चगेटमधील कार्यालयात देण्याचं ठरलं तर दुसरा हफ्ता दुसऱ्या दिवशी देणार असं निश्चित झालं.

सीबीआयने सापळा रचला, 25 लाख रुपये गोळा केले, पण...

परंतु व्यापाऱ्याला लाचेची रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने म्हणजेच त्याच्या मित्राने सीबीआयकडे संपर्क साधला आणि व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअॅप कॉल्सचे पुरावे सादर करत तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या आरोपांची पडताळणी करुन सापळा रचला. त्यानुसार सीबीआयने 25 लाख रुपयांची रक्कम जमा केली. सीजीएसटी अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार, लाचेच्या रकमेचा पहिला हफ्ता राखाडी-निळ्या रंगाची बाईक घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीला देण्यात आला. त्या व्यक्तीने सीजीएसटी अधिकाऱ्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारली आणि पण सीबीआय अधिकारी त्याला पकडण्याआधीच त्याने तिथून पळ काढला.

सीजीएसटी अधीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान करचोरी प्रकरण श्री बुलियनशी संबंधित असल्याचं आणि ते धीरेंद्र कुमार याच्याकडे प्रलंबित असल्याचं तपासात उघड झालं आहे. यानंतर सीबीआयने धीरेंद्र कुमारच्या घरी तपास केला असता तो तिथे आढळला नाही, शिवाय त्याचा मोबाईल फोन देखील बंद असल्याचं आढळलं. यानंतर सीबीआय सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि लाचखोरीशी संबंधित व्यक्तींची ओळख पटवली. अमृतलाल शांखला आणि त्याचा कर्मचारी बबन याने धीरेंद्र कुमारच्या वतीने पैसे गोळा केले होते. धीरेंद्र कुमार, अमृतलाल शांखला आणि त्यांचा कर्मचारी बबन यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget