एक्स्प्लोर

Dombivli Crime : 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण, पोलिसांकडून आठ तासात फिल्मी स्टाईलने सुखरुप सुटका

Dombivli Crime : चार अपहरणकर्त्यांनी 50 लाखांच्या खंडणीसाठी डोंबिवलीमधील एका व्यापाऱ्याचं अपहरण केलं. याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी फिल्मी स्टाईलने अवघ्या आठ तासात या व्यापाऱ्याची शहापूर इथून सुखरुप सुटका केली.

Dombivli Crime : एखाद्या सिनेमाचे कथानक असावे अशा पद्धतीने चार अपहरणकर्त्यांनी 50 लाखांच्या खंडणीसाठी डोंबिवलीमधील (Dombivli) एका प्लायवूड व्यापाऱ्याचं अपहरण केलं. याबाबत मानपाडा पोलिसांना (Manpada Police) माहिती मिळताच त्यांनी फिल्मी स्टाईलने अवघ्या आठ तासात या व्यापाऱ्याची शहापूर इथून सुखरुप सुटका केली. पोलिसांनी चार अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील एक आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मराज कांबळे आणि रोशन सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. आरोपी बेरोजगार असल्याने झटपट पैसे कमवण्याच्या लालसेपोटी अपहरण केल्याची तपासात उघड झालं आहे.

झटपट पैसे कमावण्याच्या लालसेपोटी अपहरण
डोंबिवली पूर्व भागातील स्टार कॉलनी परिसरात मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिम्मत नाहर यांचे डिलक्स प्लायवूड हे दुकान आहे. हिम्मत यांच्याशी कारपेंटर असलेला संजय विश्वकर्मा याची ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत संजयने आपल्या साथीदारासह पैशांच्या लालसेतून हिम्मत यांचे अपहरण करण्याचा प्लॅन आखला. यासाठी त्याने एका ट्रॅव्हल कंपनीकडून शिर्डीसाठी एक गाडी भाड्याने घेतली. 3 ऑगस्ट रोजी संजय विश्वकर्मा त्यांच्या दुकानात गेला. त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगत संजयने हिम्मत यांना दुकानाबाहेर काढत गाडीच्या दिशेने घेऊन गेला. गाडीमध्ये संजयचे साथीदार बसून होते. गाडी एटीएमजवळ पोहोचताच त्यांनी हिम्मत यांना पुढच्या एटीएममध्ये जाऊ, असे सांगत गाडी पुढे नेली. काही अंतरावर हिम्मत यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आणि त्यांचे अपहरण केले.

काही तासातच अपहरणकर्त्यांनी हिम्मत यांचा पुतण्या जितू याला फोन करत हिम्मत सुखरुप हवे असतील तर 50 लाख रुपये द्या अशी मागणी केली. जितूने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. डीसीपी सचिन गुंजाळ, डोंबिवली एसीपी सुनील कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधिकारी सुनील तारमळे आणि अविनाश वणवे यांची पथके तयार केली. 

गावकऱ्यांच्या वेशात पोलीस
तांत्रिक तपास सुरु असताना अपहरणकर्ते दर तासाला जितूला फोन करत ठिकाण बदलत होते. अखेर त्यांनी जितू यांना मुंबई-आग्रा रोडवरील शहापूरजवळ गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांची चार पथके स्थानिक गावकऱ्यांच्या वेशात गोठेघर परिसरात दबा धरुन बसली होती. जितू त्या ठिकाणी पैसे घेऊन गेले. थोड्याच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार आली. त्यात तीन व्यक्ती होते. जितूने आधी काकांना मला माझ्या ताब्यात द्या असं सांगितलं. त्याचवेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या गाडीला घेरत तिघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हिम्मत यांना गावातील एका खोलीत कोंडून ठेवल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या खोलीत जाऊन हिम्मत यांची सुखरुप सुटका करत त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या चौथ्या आरोपीला ताब्यात घेतले. 

अंधाराचा फायदा घेत एक आरोपी पसार
हिम्मत यांना या खोलीत पलंगाला बांधून ठेवण्यात आलं होतं. यावेळी आणखी एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या प्रकरणी संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मराज कांबळे आणि रोशन सावंत या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून झायलो कार, पाच लाखांची रोकड, चार मोबाईल फोन जप्त केले आहेत. मानपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात पोलिसांनी कारवाई करत व्यापाऱ्याची सुटका केल्याने त्यांच्या कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget