एक्स्प्लोर

SIP : 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक SIP बंद, जून मधील आकडेवारी समोर, बाजार उच्चांकावर असताना खातं बंद करणं फायद्याचं की तोट्याचं?

SIP Closure : 2025 मध्ये 1 कोटींहून अधिक एसआयपी बंद झाल्या आहेत. ज्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार एसआयपी थांबवणं चुकीचं ठरु शकतं. 

मुंबई : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आता लोकप्रिय झाली आहे. अनेक जण एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, 2025 मध्ये एसआयपी बंद होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुच्युअल फंड गुंतवणूकदार एसआयपी बंद करुन बाहेर पडत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियाच्या आकडेवाीरनुसार या वर्षात 1 कोटींहून अधिक एसआयपी खाती बंद झाली आहेत. 

जून  2025 मध्ये 48 लाख एसआयपी खाती बंद झाली किंवा मॅच्युअर झाली आहेत. यामुळं एसआयपी स्टॉपेज रेशो 77.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. वॅल्यू रिसर्चच्या रिपोर्ट नुसार ही आकडेवारी महत्त्वाची आहे. कारण जितकी एसआयपी खाती सुरु झाली तितकीच खाती बंद होत आहेत. 

जूनमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम 27269 कोटी रुपयांच्या उच्चांकवर पोहोचलेली आहे. एसआयपी खात्यांची जून महिन्यातील संख्या 9.19 कोटी झाली आहे. मेमधील खात्यांची संख्या 9.06 कोटी होती. जून महिन्यात 8.64 कोटी  एसआयपी खात्यातून गुंतवणूक झाली. मे महिन्यात ही संख्या 8.56 कोटी होती. 

एसआयपी स्टॉपेज रेशोच्या आकडेवारीनुसार जितकी खाती बंद झाली तितकी नवी खाती सुरु झाली आहेत.  तज्ज्ञांच्या मते याचा हा अर्थ नाही की गुंतवणूकदार बाजाराच्या बाहेर जात आहेत. काही एसआयपी  मॅच्युअर होत आहेत. तर, काही खाती तांत्रिक कारणांमुळं बंद होत आहेत. 

Lemonn Markets च्या गौरव गर्ग  यांच्या मते बाजारातील उच्च मूल्यांकनामुळं गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. हाय वॅल्यूएशनच्या भीतीमुळं काही एसआयपी खाती बंद होत आहेत. मात्र, डेटानुसार दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते. 

Fin Edge चे सह संस्थापक आणि सीईओ हर्ष गहलोत यांनी एसआयपीबाबत सतर्क केलं आहे. जेव्हा मार्केट उच्चांकावर असताना एसआयपी बंद करण योग्य वाटू शकतं. मात्र, दीर्घकालीन विचार करता ते नुकसान करणारं  ठरू शकतं. एसआयपीचा उद्देश सातत्यानं गुंतवणूक करणं हा आहे. 

एसआयपी सुरु करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

एसआयपीचा खरा फायदा कम्पाऊंडिंग आणि रुपी कॉस्ट अवरेजिंगद्वारे मिळतो. जो वेळेनुसार वाढत असतो. एसआयपीचा वेळ 5-10 वर्ष असावा. एसआयपीचा उद्देश तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक करणं हा नव्हे तर मार्केटच्या प्रत्येक स्थितीत गुंतवणूक करणं हा आहे.  तुमच्या जोखीम क्षमतेनुसार, किती रक्कम उभारायची आहे, यानुसार इक्विटी, हायब्रिड आणि डेट फंड निवडावा. संशोधन करुनच फंड निवडावा. कोणत्याही फंडाची जुनी कामगिरी पाहावी मात्र ती भविष्याची गॅरंटी नसते. एसआयपी सुरु केल्यानंतर प्रत्येक वर्षी आढावा घेणं महत्त्वाचं आहे. 
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget