एक्स्प्लोर

ELI योजनेचे 15000 रुपये कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार? EPFO योजना राबवणार, अंमलबजावणी कधी पासून सुरु होणार?

ELI : केंद्र सरकारच्या ELI योजनेची अंमलबजावणी केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ईपीएफओकडून केली जाणार आहे. ही योजना 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 1 जुलै रोजी ईएलआय म्हणजेच एम्पलॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्ह योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेची अंमलबजावणी 10 दिवसानंतर सुरु होणार आहे. ही योजना  1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या दरम्यान सुरु राहणार आहे. या दोन वर्षांच्या काळात पहिली नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15000 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. हा भत्ता दोन टप्प्यात दिला जाईल. या योजनेद्वारे नोकरी देणाऱ्या संस्थांना किंवा कंपन्यांना भत्ता दिला जाणार आहे.  

15 हजार रुपये कुणाला मिळणार? 

केंद्र सरकारनं देशभरात रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. ही योजना दोन वर्ष सुरु राहील. 1 ऑगस्टनंतर जे पहिली नोकरी सुरु करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारनं 99446 कोटी रुपयांचा निधी ईएलआय योजनेसाठी मंजूर केला आहे. या योजना कालावधीत देशात 3.5 कोटी नोकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा उद्देश आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या अतंर्गत येणार्‍या  ईपीएफओकडून केली जाणार आहे. 

1 ऑगस्टनंतर ईपीएफओच्या पोर्टलवर ज्यांची नोंदणी होईल आणि यूएएन क्रमांक जनरेट होईल त्यांना या योजनेसाठी पात्र धरलं जाईल. पहिल्या नोकरीत जॉईन झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात त्याच कंपनीत कर्मचाऱ्यानं काम करणं अपेक्षित आहे. सहा महिन्यानंतर 7500 रुपये कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केले जातील. ईएलआयचा दुसरा हप्ता 12 महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यानं आर्थिक सक्षमतेसंदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण करणं अपेक्षित आहे. 

दुसऱ्या हप्त्यापैकी काही रक्कम बचत म्हणून ठेवली जाईल. ती निश्चित कालावधीनंतर कर्मचाऱ्याला काढता येईल.  केंद्र सरकारनं 2024-25 च्या अर्थसंकल्पात ईएलआय योजना जाहीर केली होती. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या 1.92 कोटी कर्मचाऱ्यांना लाभ होणं अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम डीबीटीद्वारे आधार ब्रिज पेमेंट सिस्टीम वापरुन दिले जातील. 


केंद्र सरकारच्या ईएलआय योजनेतून ज्या प्रकारे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर निधी दिली जाणार आहे त्याच प्रमाणे कंपन्यांना देखील प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. 1 लाख रुपये पगारांपर्यंत नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांना ईएलआय योजनेतून प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपोटी संबंधित कंपनीला दोन वर्षांच्या काळासाठी दरमहा 3000 रुपये निधी कंपनीला मिळेल.  उत्पादन क्षेत्रासाठी या योजनेचा काळ चार वर्षे असेल.  

ईपीएफओकडे ज्या कंपन्या नोंदवलेल्या असतील आणि जिथं 50 पेक्षा अधिक कर्मचारी असतील ते दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करु शकतात. ज्या कंपनीत 50 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांना 5 कर्मचारी अतिरिक्त कर्मचारी सहा महिन्यांसाठी सलगपणे नियुक्त करावे लागतील. कंपन्यांना प्रोत्साहनपर रक्कम पॅनकार्डशी जोडलेल्या खात्यांमध्ये दिले जातील.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget